पाशु जीवन - भाग 2 | PASHU JEEVAN - PART 2

PASHU JEEVAN - PART 2 by पुस्तक समूह - Pustak Samuhशैलजा ग्रब - SHAILJA GRUB

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

शैलजा ग्रब - SHAILJA GRUB

No Information available about शैलजा ग्रब - SHAILJA GRUB

Add Infomation AboutSHAILJA GRUB

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ घोडा पाळीव प्राण्यांमध्ये इमानीपणात कुत्र्याच्या खालोखाल घोड्याचा नंबर लागेल. घोडा पूर्वीपासून माणसाचा अतिशय इमानी दोस्त आहे. माणसाने घोड्याशी केव्हा दोस्ती केली हे सांगणे कठोण आहे. परंतु काही पुरावे असे सापडले आहेत की, सुमारे चार हजार वर्षांपासून घोडा माणसाकडे पाळीव प्राणी म्हणून होता घोडा मळचा रानटी प्राणीच होता. आजही पुरेसे शिक्षण न दिल्यास किवा नीट काळजो न घेतल्यास ते जंगली जनावरा- सारखे उद्धटपणाने वागतात. आशिया आणि युरोप खंडात संत्र वेगवेगळ्या जातींचे घोडे आहेत. अरबी घोडे सर्वांत उत्तम जातीचे समजले जातात. आपल्याकडे भोमथडीची तट्टे प्रसिद्ध होती. घोडा अतिशय उमदा व देखणा आहे. तो अतिशय चपळ असून दौड करण्यात उ (२५) तरबेज असतो. माणस शिंकवील तसे तो वागतो. अनेक प्रकारची कासे करतो. त्यामुळे माणसाने त्याला जवळ केले आहे. घोड्याचा रंग पर्ण काळा, पांढरा, तांबडा, सोनेरी आणि कबरा असतो. तसेच घोड्याच्या अंगावर मधूनच वेगवेगळ्या रंगांचे डाग असतात. घोड्याच्या मानेवर केसांची सुंदर आयाळ असते. त्याचे शेपुटही झपकेदार असते. घोडा अतिशय ताकद- वान असतो. तो कित्येक तास सतत धाव शकतो. घोड्याच्या ताकदीवरून इंजिनाची शक्‍ती मोजतात. अश्‍व म्हणजे घोडा. एक घोडा जेवढं काम करतो त्याला (एक अश्वशक्ती 'चे काम म्हणतात. पाच अश्‍्वशक्तीचे इंजिन म्हणजे पाच घोड्यांचे कास करणारे इंजिन. (शास्त्रीय भाषेत ७५ किलो वजन १ सेकंदात १ मीटर नेण्यास लागणारी शक्‍ती म्हणजे सुमारे १ अश्वशक्ती. ) पर्वा राजेरजवाड्यांच्या रथाला घोडे जोडले जात असत. . त्यांचा उपयोग लढायांमध्ये केला जाई. घोड्यावर बसून स्वारीवर जात, शत्रशी लढत, शत्रचा पाठलाग करीत. ज्या राजाकडे घोडदळ मोठे तो राजा मोठा. त्यानंतर जसजसा बंदुका, मशीन-गन्स यांचा शोध लागन त्यांचा लढाईमध्ये वापर होऊ लागला, तसतसा घोड्यांचा वापर लढाईत कमी होऊन त्यांचे महत्त्व कमी होऊ लागले. परंतु लढाईखेरीज कितीतरी इतर गोष्टींसाठी त्यांचा, उपयोग होतच आहे. टांग्याला घोडे जुंपून त्यातून माणसे नेतात. घोड्यावर बसून प्रवास करतात. धनगर लोक घोड्यावर बिऱ्हाडाचे | सामान लाहून एका गावाहून दुसऱ्या गावी जातात. लग्नात घोड्यावर बसवून नवरदेवाची मिरवणूक काढतात. मंबई, महाबळेश्‍वर, माथेरान, पुणे, कोल्हापुर अशा गावी मुलांना एक-दोन रुपयात घोड्या-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now