कोसबाडच्या टेकड़ीवरून | KOSBADCHI TEKDIVARUN

KOSBADCHI TEKDIVARUN  by अनुताई वाघ - ANUTAI VAGHपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

अनुताई वाघ - ANUTAI VAGH

No Information available about अनुताई वाघ - ANUTAI VAGH

Add Infomation AboutANUTAI VAGH

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२८ कोसबाडच्या टेकडीवरून “मुलगी कुणाची १ जाईल आपल्या घरी! चिमण्या उठून जातील ! अस्‌ द्या. मला मुली पण आवडतात !”' त्यांनी मुली झाल्या म्हणून कधींच खंत केली नाही. उलट, सगळ्या सुळींना अत्यंत माथेने ब लाडाने ते वागवीत असत. “पप्या” (माझे लाडके नाव 1), “ किथ्या”', “माल्या?” “लिल्या? अशा ते मुलांच्या नावानेच हाका मारीत. कोणालाही कधी रागावल्याचे व मारल्याचे माझ्या आठवणीत माही. “पुन्हा कोठे काही घेशील का?!” आई एक गोष्ट सांगत असे. मी त्या वेळी तीन वर्षांची होते. जेवू लागले होते. आबा सकाळीच कामावर जायचे. ते बारा वाजता जेवायला घरी यायचे. लहान मूल म्हणून थरात मी एकटीच होते. तेव्हा शोजारी मुलांच्यात खेळायला जायची. रोजारचे ग्रहस्थही आबांच्या ऑफिसातलेच क्लार्क होते. द्याळेची वेळ झाली की मे जेवायला बसायची. त्या वेळी शेजारीग काढू साहजिकपणे मलाही जेवायला बसवायच्या, आबा जवायच्या वेळी 'चौकशी करायचे, “पपी कुठे आहे १? “शेजारी खेळायला गेठी आहे! ”, “तेथेच जेवली !'* रोज रोज आबा हे ऐकत असत. दॉबटी त्यांना या गोीचा फारच राग आला. एके दिवशी ते उठले. शेजारी गेळे. तेथून मारीत मारीत मला घेऊन आहे. “पुन्हा कोठे जेवायला जाशील झा ? कोणाकडे काही घशीळ का ? मागशील का??? असा त्यांनी मला दम दिला होता. पुढे एकटा माझा मामा महा एका बोहर्‍्याच्या दुकानात घेऊन गेला होता. दिवाळी'चे दिवस होते, म्हणून त्या बोहऱ्याने मला फटा[कड्याचच सर देऊ केले. मी ते मुळीच बेतले नाहीत. मामाला आश्चर्य वाटले. तेव्हा आईने वरील हक्गित मामाळा सांगितली, अर्थात यात मला काहीच आठयत नाही. आबांना दोणा- वरह्या रागावताना, कोणाळा मारताना मी कधीच पाहिलेले नाही. त्यांना दुसऱ्या कोणाचा राग आला तर ते बराच थळ गप्प बसून राहत असत. अ(वांना शिकायचे होते आ्रांचे लढ्(नपग फार कटात गेळे. त्यांच्या ठहानपणीच त्यांची आई वारली. म्हणजे त्यांच्या पाठीवरची तीन महिन्यांची बहीण माग ठेवूनच ती गेठी. आमच्या आजोबांनी दुसर टय़ केले नाही. त्यांची काढू घरात होती. *आबई? हे तिचे नाव. यांनी ह्या दोत्राही भावंडांना बाढविळे. आमच्या आत्याबाई--गंगूताई--यांना त्रकरीचे दूध पाजून मोठ कळे म्हणे. र मोरगावच्या ्याळेत आबा जाऊ छागळ. ते फार बुद्धिमान होते. गणितात त्यांचा कोसबाडच्या टेकडीवरून २९ हातखंडा असायचा. वर्गात नेहमी पहिला नंबर. दांडगाई, खोड्या काही नाही. आबा इयत्ता सातवीची परीक्षा चांगल्या प्रकारे पास झाले. पुढे शिक्षणाची तेथे सोय नव्हती. आमची थोडी शेती होती. त्यावरच उदरनिर्वाह होता. आजोबा स्वतः काहीच उद्योग करीत नव्हते. देवपूजा, जपजाप्य, रप्पा यांच्यातच त्यांचा विच जायचा. आबांना तर पुढे शिकायचे होते. म्हणून ते आजोळी शिरवळला गळ, त्यांचे आजीचा (आईचे वडील) फौजदार होते. त्यांच्या ठिकठिकाणी ब्टल्या होत, त्यांच्या विऱ्हाडाबरोबर आवाही त्या स्या गावीच असत. त्यामुळे त्यांचे शाले शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. आजोबांचे कुंटुंब पुष्कळच मोठे, म्हणून आ्बात! घरकामात मदत करावी लागे. पुढे त्यांना पोस्टमनचे काम मिळाले. त्यासाठी खूर हिंडावे लागे, पण पाकिटावरचे पत्ते वाचून आबा इंग्रजी शिकले. य “ अरे, आबा येणार! अडलेली उदाहरणे काढून ठेवा! त्यानंतर पी० डब्ल्यू डी०्मध्ये आबांना क्लार्कची नोकरी मिळाली. पहिली नोकरी बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे होती. तेथळी नोकरी काही कारणाने सोडली. पण त्याच खात्यात भुसावळ येथे त्यांना पुन्हा नोकरी लागली. तेथेच त्यांच्या हुशारीची चुणूक दिसली. पी० डब्ल्यून डी०्च्या ऑफिसच्या आवारात लाकड ऱ्य लांब छांब वासे आणले होते. पुढच्या वर्षी पुन्हा नवीन आले. त्याच्या पुढील वर्षीही आले. हा नित्यक्रम झाला. यात नवे कोणते, जुने कोणते, ओळखा- यचे कसे १ आबांनी पहिल्या वर्षापासूनच दखर्षी आलेल्या वाश्यांवर काही विदिष्ट खुणा करून ठेवल्या होत्या. एकदा साहेबांना नवे-जुने वासे ओळखायचे कारण पडले. त्या वेळी खुणांच्यामुळे ते चटकम ओळखता आले. साहेबांनी आमच्या आबांना विदेष लिखित शाबासकी दिली. इयत्ता सातबीची परीक्षा झाल्यानंतर आबांनी मोरगाव सोडले. तरीपण ते मधून- मधून गावी येत असत. आवा येणार असल्याची चाहूल लागताच शाळेतले इयत्ता सातवी'चे शिक्षक मुलांना सांगत, “अरे, आरा येणार आहेत बरे का! अडलेली उदाहरणे काढून ठेवा. ” दिक्षकांना न सुटणारी उदाहरणे आबा सोडवून दाखवीत असत. त्यांना शिकण्याची संधी मिळाली नाही म्हणून त्यांच्या बुद्धीची 'चमक दिसली नाही. नाही तर ते चांगले गणिती अगर इंजिनियर म्हणून पुढे आले असते. त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा वारसा पुढील पिढीला अवदय मिळाला आहे. आम्ही चारही बहिणींनी आपापल्या कामात विशेषता दाखविली आहे. आमच्या भावाने आमच्या आबांची *एक्झिक्युटिव्ह इंजिनियर? होण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण केली. त्यालाही घरणाच्या कामाबद्दल सरकार कटून विशेष लिखित शाबासकी मिळाली. नातवंडे अशीच बुद्धीने चमकत आहेत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now