मराठी साहित्य समाळोचन | Marathi Sahitya Samalochan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Marathi Sahitya Samalochan by वि. सी. सरवटे - Vi. Si. Sarvate

More Information About Author :

No Information available about वि. सी. सरवटे - Vi. Si. Sarvate

Add Infomation AboutVi. Si. Sarvate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना सस पुढील समालोचनांत सन १९३४ अखेरील ग्रंथांचाच अंतर्भाव केलेला आहे, ब त्यांतील विवेचन त्यावेळीं विद्यमान असलेल्या वाड्मयीन व इतर परिस्थितीला अनुलक्षून केलेले आहे. कर प्रस्तुत ग्रंथ मराठी भाषेचा इतिहास नाही. मराठी भाषा जन्माला कशी आली, तिचे स्वरूप वेळोवेळीं कसें बदलत गेले, इतर भाषांचा तिच्यावर कोणता परिणाम झाला, या व अशाच स्वरूपाच्या इतर भाषाशास्त्रविषयक प्रश्नांचा ऊहापोह या ग्रंथांत येणार नाही. त्याचप्रमाणे हा मराठी वाळाययाचा इतिहासदह्दी पण नव्हे. ते वाड्मय निमाण होण्यास किंवा त्यांत स्थित्यंतरे घडण्यास झालेलीं कारणें आणि त्या वाड्ययाने केलेलं कार्य याची मीमांसा करण्याचें या ग्रंथाचे ध्येय नाही. वरील दोन्ही गोष्टींचा विचार आनुषंगिक व गोणरूपाने यथावकादय होईल. पण आमचें मुख्य उद्दिष्ट निर्माण झालेल्या ग्रंथाचे सम्यकू आळोचन करावे, त्यांतील भाव विशद करून गुणावगुणांचे परीक्षण करावें, हं आहे. समालोचनाचे तीन खंड केले असून पहिल्या खंडांत स. १८१८ तें १८८५ पावेतेंच्या साहित्याच्या सवे अंगांचे विवेचन, दुसऱ्या खंडांत स. १८८९ ते १९ ३४ पावेतोंच्या ललित वाड्ययाच विवेचन व तिसऱ्या खंडांत या कालांतील साहित्याच्या शाखीय व इतर अंगांचे विवेचन करण्याची योजना आहे. प्रथमतः तीन्ही खंड एकत्र प्रकाशित करण्याचा संकल्प होता. परंठु अथाच्या ग्रारेभींचा अदमास अगदींच चुकला, त्याचा विस्तार उप्कळच वाढल्या आणि त्या मानांनच वेळही जास्त लागूं लागला व बाहेरून प्रकाश-' नाची निकड लागळी. तेव्हां छापून झालेले पहिले दोन खंडच प्रकाशित करून वाचकांच्या हातीं सोपवावेत, त्याने मागील निकड' तेवढी कमी होऊन, झालेल्या कार्यातील शुण दोषांची परीक्षा होईल आणि उपयुक्त सूचना मि ळून उरलेल्या कामास कदाचित मदत मिळेल, या विचाराने दोन खंड प्रकाशित केले आहेत. एका दृष्टीने हल्लींच्या स्थितीतही हा ग्रंथ पूर्ण आहे. त्यांत स. १८१८ ते १८८ प या कालांतील साहित्याचे संपूर्ण विवेचन आले आहे. पुढील स. १९ ३४ पावेतोंच्या काळांतील ललित बाड्ययांतील पद्म, कथा, कादंबऱ्या व नाटके या चारी अंगांचे समालोचन . इ झाले असून, शेवटीं उपसंहारांत या वाड्मयाचें संकलित पर्यालोचन केलें आहे,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now