कळाआणि कळास्वाद | Kala Aani Kalasvaada

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kala Aani Kalasvaada by दा. भालेराव - Da. Bhaleravमोतीचंद्र - Motichandra

More Information About Authors :

दा. भालेराव - Da. Bhalerav

No Information available about दा. भालेराव - Da. Bhalerav

Add Infomation About. Da. Bhalerav

मोतीचंद्र - Motichandra

No Information available about मोतीचंद्र - Motichandra

Add Infomation AboutMotichandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बारा : कळा आणि कळास्थाद ।ः मिळवून दिलेल्या आहेत. पण त्यांचा उपयोग आपण नीट रीतीनें करून घेत नाहीं. घन खुप आहे, पण वांटणी विषम आहे. यंत्राने वेळ वांचवला आहे, पण त्याचा उपयोग सामर्थ्य केन्द्रित करण्याकडे होतो अशी स्थिति आहे. ज्ञान हें चांगले असतें, पण त्याचा उपयोग करण्यापूर्वी विचार करायला हवा आहे, परिणामांची कल्पना करायला दृवी आहे. घोडक्यांत म्हणजे तें पचलें पाहिजे. तसें तें पचले म्हणजे मग तें माणसाच्या मनाची उंची बाढवायला उपयोगीं पडतें. त्याचें मन सुसंस्कृत करतें. माणसाची बुद्धि व कल्पनाशक्ति हीं ज्ञानाच्या अभावीं उपाश्षी मरतील हें खरं आहे. पण आपला हा नेहमींचा अनुभव आहे कीं, सगळीं ज्ञानी माणसं हीं कांहीं वृत्तीनं चांगलीं असतातच असें नाहीं. कोणत्याही गोष्टीचा उपयोग चांगल्या तऱ्हेने करून घेण्यास माणसाची वृत्ति चांगली असावी लागते. चांगली वृत्ति ही मन सुसंस्कृत आणि अमिरुचीसंपन्न असल्याशिवाय प्राप्त होत नाहीं. माणसाच्या बुद्धीचा विकास होणें अवश्य आहे हें जितकें खरें तितकेच, किंबहुना त्यापेक्षांही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची वृत्ति चांगली असली पाहिजे. ही इत्ति सतत चांगली राहण्यास त्याच्या मनावर चांगले संस्कार घडले पाहिजेत. वरच्या वातावरणांत मन रमविण्याला शिकलें पाहिजे. अभिरुची वरच्या प्रतीची असल्याशिवाय हें शक्य होत नाहीं. श्रेष्ट भावनेच्या राज्यांत विहार करायला शिकलें तरच आयुष्य समृद्ध होण्याची शकयता आहे. केवळ खाण्यापिण्यांत, कपडेलत्ते बापरण्यांत, उटणीं-अत्तरें लावण्यांत समाघान मानणें हें अगदीं खालच्या प्रतीचें आहे. जिभेळा खावेसे वाटतें अगर कानांना ऐकावेंसें वाटतें हें दोषास्पद आहे असें नाहीं, पण त्यापासून मिळणारें समाधान हें थोडा वेळ टिकते. अनेक गोष्टी करण्याचें ठरवणें, मनोरथ रचणें, कल्पनेचे पर्वत उभे करणें, शंका आशंका घेणें, कांहीं गोष्टींना भनतें महत्त्व देणें, कांह्दींना उपेक्षणें, कांहींच्या पाठीमागें घांवणे, त्याकरितां अनेक कष्टही सोसणें हें वरच्यापेक्षा पुष्कळ ब्र. मनाला एका कामीं लावणें, कल्पनादाक्तीला तर्कशुद्ध वाटेवरून नेणें, योजनापूर्वक कोणत्याही कार्याची आंखणी करणे, मागीळ अनुभवावरून पुढील घटनांचा कयास बांधणें हं फारच चांगलें. पण भावनेला गुद्धत्र देऊन, बुद्धीची तार परजती ठेवून विशाळतर ध्येयांत आपलें जीवन मिळवून देणें, निरपेक्षतेनं अखंड लोकसेवा करणें, सत्याचा शोध घेणें आणि सौंदर्याची उपासना करणें हें सवीत उत्तम. माणसाची जाणीव जसजशी विकसित होत जाईल तसतसे त्याचे जीवन मोठे होत जाईल. पुंदर कपडे घालण्यापासून आनंद होतो, परोपकार करण्यांत आनंद होतो. एका आनंदापेक्षां दूसरा श्रष्ट आहे ह उघड आहे. हा आनंद, हें सुख, हें समाधान कलाकृतीच्या आस्वादानें मिळतें, माणसाचें मन स्वर्गीय वातावरणांत बावरू: लागतें. जेथें हेबा-दावा, द्वेष, असूया, अहंकार, संकुचितपणा, यांना थारा नाहीं ; लोभ, हांब यांना अवसर नाहीं. कल- कृतीचा आत्याद घेतांना मन हें फार वरच्या पातळीत संचार करीत असतें. तेथे स्त्रार्थ शून्य होतो आणि परम-भअर्थ हातीं लागल्याचं समाधान माणसाला अनुभवता येतें. आर्निंदाचा खोत अखंड वाहता ठेवण्याचें सामर्थ्य कळोपासनेंत निश्चित आहे. आयुष्य भव्योदात्त करणारी कलोपासना, आणि चांगले सस्कार आणि अभिरुची मिळवून देणारें रसास्वादन यांची ओळख रा््रंतीळ प्रध्येक नागरिकाळा होईल तर जगांतील कितीतरी घटनांची स्वरूपे बदललेली दिसतील. १लाकृति निर्माण करणें आणि कलाकृतींचा रसास्वाद घेणें म्हणजे झुखाच्या राजवाड्यांत राहणें होय. ही कल्पना ज्या दिवशीं सामान्य लोकांच्या मनांत चांगल्या तऱ्हेने रुजेल तो दिवस सुवर्णमोलाचा समजला जाईल, मग त्याची इतिहासांत नोंद होवे अगर न होवो. या विश्वांत कितीतरी गोष्टी अशा आहेत, कीं जयांच्यापासून आपल्याला हवा तेवढा आनंद आणि छुख मिळविता येण्यासारखें आहे, पण तो कसा मिळवावा याचें ज्ञान आम्हांला नाहीं ! भाम्हांला तशी दट मिळून देणें ब घेणें हे भाजच्या अनेक मोठ्या राष्ट्रीय काघौतले मह्त्त्माचें काय आहे. आजच्या युगाची ती एक मोठी गरज आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now