स्वतंत्र भारतांत लोकराज्य | Svatantr Bhaarataant Lokaraajy

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Svatantr Bhaarataant Lokaraajy by पुरुषोत्तम रामचंद्र - Purushottam Ramchandra

More Information About Author :

No Information available about पुरुषोत्तम रामचंद्र - Purushottam Ramchandra

Add Infomation AboutPurushottam Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नेमलेली समिती म्हणून तिची निवड झाली. त्या वेळीं आपला देश हा अविभागलेला एकजिनसी व अखंड असा देश होता. व्या वेळचे निवड झालेले मुस्लिमलीगचे सदस्य त्या समितीबरोबर त्या वेळीं असहकार करीत असून त्यांनीं त्या समितीवर बहिष्कार घातलेला होता. कार्याच्या आरंभीं घटनेच्या उद्दिष्टांच्यासबंधीं एक विचारपूर्वक ठराव ता. १३-१२-१९४६ इसवी रोजीं पंडित जवाहरलाल नेहरू यांनीं मांडला व तो ठराव ता. २२-१-१९४७ रोजीं सवोनुमंत पास करण्यांत आला. त्या ठरावाचा निदश हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा असा करण्यांत येतो. त्या ठरावांत तीन महत्त्वाची उद्दिष्ट नमूद करण्यांत आलीं ह्ोतींः--- (१) हिंदुस्थान हें एक स्वतंत्र सावेभौम लोकसत्ताक राज्य (०७०)](८) असेल. (२) हिंदुस्थान हें एक संघराज्य ( (10107 ) राहील व (३) त्या संघांतील निरनिराळीं राज्यें हीं स्वायत्त ( &(070000005) घटक असतील व संघराज्याला देण्यांत येतील ते अधिकार व हक्क सोडून बाकीचे सवे शासनसंस्थेचे अधिकार व हक्क या घटक राज्यांकडे राहतील. या ठर्ावानंतर संघराज्याचे अधिकार ठरविण्याकरितां एक कमिटी (युनियन पावस कमिटी ) नेमण्यांत आली व त्या कमिटीचा रिपोर्ट ४७1१९४७ रोजीं प्रसिद्ध करण्यांत आला. त्या रिपोर्टांत संघराज्याची वरील कल्पना कायम होती व त्यामध्यें या संघराज्याचा निर्देश (1८29. ४00) या नांवानें केलेला आहे. परंतु त्यानंतर देशांत दूरगामी अशा घडामोडी झटपट घडत होत्या. ता. १५७५८1१९४७ ला हिंदुस्थानांतील रहिवाशांना स्वातंत्र्य मिळालें परंतु त्याचबरोबर देशाचीं तीन शकलें झालीं. पूवे पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तान म्हणून दोन टोकाला निर्माण झालेल्या दोन तुकड्यांचे पाकिस्तान म्हणून एक नवीन राष्ट्र निर्माण झालें. देशाच्या या फाळणीमुळें जी मानवी संहाराची व नाशाची लाट उसळली तिला इतिहासांत देखील क्कचितच तोड आढळून येईल. त्याच वेळीं घटनासमिती ही फक्त घटना तयार करण्यापुरतीच मर्यादित समिती न राहतां तिचंच रूपांतर हिंदुस्थान देशाचें मध्यात कायदेमंडळ म्हणूनहि झालें. या एतिहासिक व दूरगामी गोष्टींचा परिणाम घटनासमितीचे कामावरहि न्ऱै




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now