व्यापारी उळाढाळी ३ | Vyaapaarii Ulaadhaalii 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vyaapaarii Ulaadhaalii 3 by वामन गोविंद काळे - Vaman Govind Kaale

More Information About Author :

No Information available about वामन गोविंद काळे - Vaman Govind Kaale

Add Infomation AboutVaman Govind Kaale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रे होत आहे. अलीकडे नवीन नवीन कंपन्या निघत आहेत, व जन्या मंडळ्यांची पुनर्घटना होत आहे. विमा मंडळ्या, बँका, साखरेचे व इतर कारखाने, व्यापारी संघ, इत्यादींची घटना, व्यवहार आणि उपयोग ह्यांविषया समाजांत कुतूहल उत्पन्न झालं आहे. तर्सेच, व्याजाचे दर उतरल्यामुळे किरकोळ कमाईवर आपला गुजारा करणाऱ्या कित्येक मध्यम स्थिततल्या बायाबापड्यांचें उत्पन्न घटलें आहे. शेतकरीवर्गाचा कर्ज- बाजारीपणा वाढला असून त्यास आणि कारागीर लोकांस तारणाचे अभावी कर्ज मिळण्याची मारामार पडत आहे, तर सुखवस्तु वगाचे पेसे, जवळच्या ठेवी व:ढल्यामुळें, बँका स्वीकारण्यास तयार नाहीत. हीं स्थित्यंतर नीट सम- जण्यास आणि त्यांपासून स्वतःचे हित करून घेण्यास, निदान त्यांच्या योगानें होणार नुकसाप्त टाळण्यास, प्रत्यही होणाऱ्या आर्थिक घडामोडीचे ज्ञान सर्व जनतेत पसरणे आवश्यक झाले आहे. ह्याकरितां सद्‌ग्ह विष- याचें थोडेस॑ विस्तृत विवेचन येथें केल्यास त उपयुक्त होईल असें वाटतें. व्यापारी बातम्यांचे मह्त्व बाजारांत नित्य होणाऱ्या उलाढालीचे व चढ-उतारांचे महत्त्व वस्तुतः सर्व नागरिकांस आहे. कारण, त्यांचा परिणाम प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीनें प्रत्येकाच्या जीवितावर होत असतो. कारखानदार आणि धंदेवाळे ह्यांनींच बाजाराच्या हालचालीकडे लक्ष्य ठेवावे, इतरांस ही उठाठेव कशास पाहिजे १ असें कोणांस वाटत अत्तेल तर ती त्यांची चूक आहे. वृत्तपत्रांत अपघात, गुन्हे, आधेकाऱ्यांच्या बदल्या व नेमणुका, निवडणुकींचे निकाल, कायदे- मंडळांतली चर्चा इत्यादींच्या हकीकती लोक वाचतात. सरकारी कर्ज- रोख्यांचे भाव चढले, मालाची आयात-निर्गत कमी-ज्यास्त झाली, चलनाचा प्रसार किंवा चणचण झाली, सोनें--चांदी महागली किंवा स्व्स्तावळी वगेरे प्रकारच्या बातम्यांचें सामान्य नागरिकांस वरील हकीकतीपेक्षां आधेक नसे तरी त्यांच्या इतके महत्त्व वाढूं नये काय ? वास्तविक पाहातां, आर्थिक उलादालींचा संबंध प्रत्येक माणसाच्या संसाराशीं येतो आणि ही वस्तु- स्थिति त्यास कळली नाहीं तरी तिचा बरावाईट परिणाम त्याच्यावर. झाल्यावांचून मात्र रहात नाहीं. मनुष्यानें आपलं प्रपंच ज्ञानपूर्वक, “सार्वघे- गिरॉनें “ नेटका ? केला पाहिजे; आणि त्याकरिता संभांवीरं काय *विलिडे आहे ह्याचें त्यास ज्ञान पाहिजे. म्हणजे दूरद्दा्टे ठेवून, येणाऱ्या आपत्तीची




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now