ऐसी हे समर्थ पदवी | Aisi He Samarth Padavi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aisi He Samarth Padavi by अशोक प्रभाकर कामत - Ashok Prabhakar Kamat

More Information About Author :

No Information available about अशोक प्रभाकर कामत - Ashok Prabhakar Kamat

Add Infomation AboutAshok Prabhakar Kamat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रामी मिनले ते असरे न्हीच यती / त्यांच्या चरण्शंची नांदी गाती ॥ सर्वांनी सर्वांचे अंतर अथवा मन राखावे. असे करणे म्हणजेच भगवद्‌भजन अशी क्रांतिकारक कल्पनाही समर्थांना अगदी सहज सुचलेली आहे : व्होष्टी येक श्रेटे नर / ध्षैड; महार चामर / राखावे तव्शचे अतर / त्या नाव भजन /॥ जनसमाजाचे सामर्थ्य वाढून, ईश्‍्वरनिष्ठांची मांदियाळी जर सर्वत्र सुखी व्हावयाची असेल तर, प्रभुरामाच्या किंवा विठोबारायाच्या भक्तांनी भजनाचा हाच अर्थ ध्यानी ठेवायला हवा. ज्या सञ्जनांनी असा अर्थ आचरला त्यांचे समर्थपण समाजाने सदैव मानलेही आहे. जनांना सज्जन करण्यासाठीच समर्थांचा सारा खटाटोप होता. त्यासाठीच त्यांनी फकिरी बाणा पत्करला. राम-कृष्णांच्या लीलागानापेक्षा प्रभूच्या प्रेरक पराक्रमाचा उद्घोष केला समाज - जागरणाचा पद्धतशीर प्रयत्न स्वामींनी जनताजनार्दनाची जागृती कण्याची ही जी मोठी तयारी केली त्यामागची देखील भावना पाहण्यासारखी आहे. 'जनता' हा शब्द फसवा आहे हे स्वामींना ठाऊक होते कारण सामान्य माणूस भाबडा असतो, साधा असतो, त्याला गर्जना करायला लावली की तो भोळेपणानं कुठल्याही चळवळीला बळी पडतो. अशी जनतेची स्थिती होऊ नये म्हणून समर्थ सांगतात जनी जनार्दन उशहे / परि तो सज्जनी वरे / जना आणि सज्जन्हाला / एकचि करतान दे ॥ सर्वांभूती ईश्‍वर आहे, तसाच जनता जनार्दन आहे. पण बाटेल तसं बोलणाऱ्या, वागणाऱ्या; मस्तवाल मंडळीत जनार्दन कसा राहील? तो असतो, सज्जनांच्या घरी !. म्हणून समाजात सञ्जनाचा मान वाढायला हवा. जग तिकडे जगन्नायक हे तर खरेच, पण त्याहीपेक्षा कळला पाहिजे विवेक' हे अधिक खोरे. समर्थांचा संदेश मग सारखा विवेकाला, मनाला जागा करणारा दिसतो रामदास्वामींचे मनाचे श्लोक हा मानवसमाजाला मिळालेला मोठा ठेवाच आहे. या श्लोकातून समर्थांनी मनाला केलेला उपदेश हा वस्तुत: जनाला केलेला आहे. तो समाजाच्या सर्व थरातील आणि परिस्थितीतील स्त्री-पुरुषांना मार्गदर्शक आहे. मन हेच मानवाच्या बंधनांचे किंवा मोक्षाचे मुख्य तारण आणि कारण आहे. मनाला सुयोग्य वळण त्लावल्याविना कोणालाच कल्याण साधता येणार नाही. “मीपणा नष्ट करावा, आचार-उच्चार आणि विचार शुद्ध ऐसी हे समर्थ पदवी... १४




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now