स्वयंनिमिर्ती | HOW DID WE KNOW ABOUT BEGINNING OF LIFE?

HOW DID WE KNOW ABOUT BEGINNING OF LIFE? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
16 अस्तित्वात नसेल. मग सागरात त्यांचा अधिकाधिक साठा होत राहिला असणार. त्यांची रचना अधिकाधिक गुंतागुंतीची बनली असेल आणि अखेर जीवनाचा उगम झाला असेल. एकदा का प्रथिने व न्युक्लिड्क अँसिड्य त्यांच्यात जीव असण्याइतकी गुंतागुंतीची बनली की त्यांच्या निरनिरळ्या प्रकारच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असतील आणि आजुबाजूची रसायने खाऊन त्यांची संख्या वाढू लागली असेल. पेशींमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल, तर काही मरून गेल्या असतील. उत्क्रांतीची सुरुवात झाली असेल, आणि त्यातून सुरू झालेल्या लांबलचक प्रक्रियेतून आजचे जग आणि आपणा सर्वांचा देखील विकास झाला असेल. तरीही प्रथिने व न्युक्लिड्क अँसिड्य यांची सुरुवात कशी काय झाली असेल? त्यांची निर्मिती जर साध्या, निर्जीव रेणूंपासून आपोआपच झाली असेल, तर आपल्याभोवतीच्या हवेतील प्राणवायूमुळे त्यांची निर्मिती झाल्याबरीबरच बहुधा त्यांचा नाशही झाला असता. पण पूर्वी वातावरणात प्राणवायु नव्हता. वनस्पती कर्बद्विप्राणील वायू शोषून घेतात व प्राणवायु हवेत सोडत असतात त्यामुळेच, म्हणजे वनस्पतींमुळेच आपल्या वातावरणात प्राणवायु आहे. सध्या वनस्पतींच्या या कृतीमुळेच पृथ्वीच्या वातावरणात ४/४ नत्रवायु व १/४ प्राणवायु आहे. वातावरणात कर्बद्विप्राणील वायु फक्त १/३000 इतकाच आहे. (कर्बद्विप्राणील वायूच्या रेणूत कार्बनचा १ व प्राणवायूचे २ अणू असतात.) १ अब्ज वर्षापूर्वी किंवा त्याहूनही आधीच्या काळात, जेव्हा वनस्पती नव्हत्या, तेव्हा वातावरणात प्राणवायूही नव्हता. त्याच्याऐवजी केवळ कर्बद्विप्राणील वायूच होता. म्हणजे पृथ्वीचे वातावरण है नत्रवायु व कर्बद्विप्राणील वायूंचेच मिश्रण होते. मंगळ व शुक्र या ग्रहांवर सजीव सृष्टी नाही, तेथील वातावरण आजही कैवळ नत्रवायु व कर्बद्विप्राणील वायूंचे मिश्रणच आहे. तथापि, पृथ्वीवरील मूळचे वातावरण तसेच असेल असे नाही. सूर्य व गुरु आणि शनिसारखे महाकाय ग्रह मुख्यत: हायड्रोजनचे बनले आहेत. धूळ व वायूच्या ज्या ढगापासून संपूर्ण सूर्यमाला बनली, तोही बहुधा मुख्यत्वेकरून हायड्रोजनचा आणि हायड्रोजनच्या व इतर काही वायूंच्या अणूंच्या संयोगातूनच बनला असावा. यातील बरीचशी संयुगे बहुधा मिथेन (हायड्रोजनचे ४ व कार्बनचा १अणु), अमोनिया (हायड्रोजनचे ३ व नायट्रोजनचा १ अणु), पाणी (हायड्रोजनचे २ व प्राणवायूचा १ अणु) व हायड्रोजन सल्फाइड (हायड्रोजनचे २ व सल्फरचा १ अणू) यांचीच असावीत. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा हायड्रोजनचे अत्यंत लहान व कमी वजनाचे रेणू (प्रत्येकी हायड्रोजनचे २ अणू) पृथ्वीला धरून ठेवता आले नसतील, पण बाकीचे रेणू तिने टिकवले असतील. पृथ्वीवरील मूळच्या सागराच्या पाण्यांत अमोनिया व हायड्रोजन सल्फाइड मोठ्या प्रमाणावर विरघळले असतील व हवेत मुख्यत: मिथेन, थोडेफार अमोनिया, हायड्रोजन सल्फाइड व पाण्याची वाफ असेल.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now