निवेदन - भाग 2 | NIVEDAN - PART TWO

NIVEDAN - PART TWO by धर्मानंद कोसाम्बी - DHARMANAND KOSAMBIपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

धर्मानंद कोसाम्बी - DHARMANAND KOSAMBI

No Information available about धर्मानंद कोसाम्बी - DHARMANAND KOSAMBI

Add Infomation AboutDHARMANAND KOSAMBI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१३२ । निवेदन नदीच्या काटी कांहीं सन्यासी चाया रहात असत, व नदीच्या वरच्या बाजूला एक गांवहि होता. होतां होईल तो या ठिकाणीं गहून आपलें कर्मस्थान पुढें चालवावे असा मीं बेत केला. पंधरावीस दिवस कसेबसे गेले; पग डोंगर चढण्याउतरण्याच्या मेहनतीने आणि ब्रह्मी लोकांच्या तेछकट वगैरे अन्नाने मळा एकाएकी भयंकर ताप आला. या विहारांतील पाणीहि फार घाणेरडे होते. एका मोठ्या होटांत पावसाचे पाणी सांठविठेले अमे, व दुसरा पावसाळा येईपर्यंत त्याचाच उपयोग करण्यांत येई. जोंपर्यंत खालीं जाण्याचें सामर्थ्य असे तोपर्यंत इरावती नदीचे पाणी पिण्यासाठी आणीत अरे. परंतु तापानें आजारी झाल्यावर हौटाचें पाणी पिण्याबांन्चून गत्यंतर राहिलें नाहीं. ते तापवून गाळून पीत असें. तथापि माझ्याने त पिववेना. 'चार-पांच दिवस असे हाल काढिल्यावर मी या स्थळाला अत्यंत कंटाळलो, व॑ थोडें बरें वाटल्याबरोबर एकदाचा माझा देह नेऊन मंडाले शहरांत टाकला. मंडाले येथे मी ऊ त्रिलोक या नांवाच्या स्थविराच्या आश्रमांत रहात असें. त्याला पालि भाषा शुद्ध बोलतां येत असे, व सुटेवाने त्याचे उच्चारहि आमच्याचसारखे असत ! आपलें ब्रत पाळण्याविषयीं त्याची' फार ख्याति असे. एखादा भिक्षु सकाळीं उशिरा उठला तर तो म्हणत असे, कीं, * मंडाले शहरांतील लहान लहान पोरी पहाटेला उठून तुमच्यासाठी अन्न शिञवीत असतात, आणि तुम्हीं त्या अव्नावर निर्वाह करून खुशाल झोंपा घेतां, याची तुम्हांला लाज वाटावयास पाहिजे !? उशिरां उठणाऱ्या मिक्षूपाठीं त्यानें एक दंड ठरविला होता. तो असा कां, आश्रमांतील झाडांला त्यांनीं पाणी घालावे, व॒ बुद्धाच्या मूर्तीसमोर अमुक घडे पाण्यानें भरून ठेवावे. एके दिवशीं सकाळी स्वतः त्रिटोकाचायच हें कर्म करीत होते. तेव्हां मी म्हणालो, “ गुरुजी, आज आपण दंड- कर्म करीत आहां, हें काय १” ते म्हणाले, “ आज मी उश्तीगं उठलो म्हणून ह कम्म करीत आहें. ” मी म्हणालो, “ पण हा नियम आपण शिष्यांना पाळण्यासाठीं केला आहे, तो आपणा स्वत:स कसा लागू पडेल १? आचार्य म्हणाले, “ आयुष्मन्‌ू आपण जो कायदा करतों, तो मोडण्यासाठी नव्हे. जोपर्यंत चांगल्या कायद्याला मान देऊन आपण चालतो, तोपर्यंतच आपली उन्नति होते. कायदा आपणां सवीपेक्षां उच्च स्थानीं आहे असें समजून त्याप्रमाणें आम्हीं सर्वांनीं मनःपूर्वक वागले पाहिजे, * दुसऱ्या एका दिवशीं त्रिलोकाचायांना मंडाले झहरांतील कममय रस्त्यांतून मिक्षेमाठीं फिरत असतांना मीं पाहिलें, वयाला साठ वर्षे झालेले हे वृद्ध स्थविर भर पावसांतून आणि चिस्वलांतून फिरत असतांना पाहून मळा मोठा अचंबा बाटला | विहारात आल्यावर मी त्यांना म्हणाळॉं, *“ गुरुजी, आपण आज्ञ पाऊस असतांना भिक्षेसाठी स्वतः गेलां हे कसें १? ते म्हणाले, “ आयुष्मन्‌. मी जर स्वतः गेला नाहीं तर विहारांतील सर्व भिक्षेना पुरण्याजोगे शाकभाजी, आमटी वगैरे पदार्थ पिळत नाहींत तरुण भिकश्चूंना गांवांत कोणी ओळखत नसल्यामुळें त्यांची दाद लागत नाहीं, व केबळ कोरडा भात देऊन त्यांची रवानगी करण्यांत येते; आणि म्हणूनच कितीहि पाऊस असला पुनः ब्रह्मदेश । १३३ व रस्ते चिखलानें भरलेले असले तरी मी भिक्षेठा जात असतों. मीं सुग्रास अन्न खावे आणि तरुण मिक्षुंतीं नुसता कोरडा भात खाबा, हें माझ्याने कसें पाहवेल १” ही गोष्ट येथ सांगण्याचे कारण हे, कॉ, त्रिलोकाचार्य जितके कडक असत, तितकेच ते दयाळू असेत, हें आमच्या वाचकांस समजाव. त्रिलोकाचार्यांची माझ्यावर फार फार मर्जी असे. मी पाहुणा असल्यामुळे मला त्यांनीं पहांटेला उठण्याचा नियम लागू केला नव्हता. विहारांत झाडलोट करण्याचे कामहि माझ्याकडे दिलें नव्हतें. गांबांतील कांहीं गहस्थांना सांगून मला रोज हिंदी पद्धतीने बन- विलेली शाकभाजी वगैरे मिळावी अशी व्यवस्था केली होती. सरासरी दहा-बारा ग्रहस्थांच्या घरीं मी जात असें, व थोडीथोडी भिक्षा घेऊन परत विह्वारांत येत असें. मंडाले शहरांत दहा हजार मिक्षु असल्यामुळे, व तेथील ळोक फारसे श्रीमंत नसल्यामुळें पुष्कळ मिक्षेना भिक्षा मिळण फार कठीण जातें. शेंद्मर घर फिरावीं, तेव्हां कोड पोटा- पुरता भात गोळा होतो. आमटी आणि भाज्या मिळविणे हे काम तर मवीन मिक्षंना जवळजवळ अश्लक्यच आहे. तथापि मी परदेशी आणि नवीन भिक्षु असूनहि माझे येथें चुत्तम. चाळत असें. मंडाले ग्रहरांतील पांगीहि चांगलें. तेव्हां एकंदरीत मला येथे सगाई- पेक्षां बर वाटलें, पण कांहीं दिवसांनीं ब्रह्म! लोकांनीं तयार केलेलें अन्न प्रकृतीस मानवत नाहीं, असा अनुभव आला. एक तर येथें दूध, तूप, वगैरे स्निग्ध पदार्थ बहुधा मिळतच नसत. दुसर, सगळ्या भाज्यांतून तिळाचें तैल वापरले जात असे. कांहीं पदार्थात तर कृच्वेंच तेल असें. त्यामुळें मला फार त्रास होऊं लामला. मंडारेची हवाहि मे महिन्याच्या सुमारास फारच कडक असते. तेव्हां मीं तेथून मे महिन्यांत मोलमिन्‌ येर्थे जाण्याचा बेत केला. बोड्धधर्माच्या प्रसारासाठीं एक सभा मंडालेला त्या वेळीं स्थापन झालेली होती. भिक्षूंना मदत करावी, व्याख्याने द्याबीं, ब्रह्मी भाषेत ब्रोद्धधर्मासंबंघानें पुस्तकें प्रसिद्ध करावीं, वगैरे कामे ही सभा करीत असे. या समेनें रंगूनपर्यंत मला तिकीट काढून दिलें. पुढला प्रवास मी बोटींतून केला. मंडाले आणि मोळमिन्‌ या दोन झ्हरांत विहाराच्या बाबतीत जमीनअस्मानाचें अंतर ! मंडाळे शहरांत ब्रह्मी राजाच्या वेळचे जरी विहार घरळे तरी त्यांची तुलना मोलमिनच्या कांहीं विहारांशीं करतां येण्यासारखी न!हीं. येथील व्यापारी फार श्रीमंत असल्यामुळें त्यांनीं मोठमोठाले विहीर बनविले आहेत. या विहारां- तून सोन्याच्या वर्म्गचीं कामे केलेलीं आहेत. पण मंडाळेसारखे येथे भिक्षु मात्र नाहींत ! एवढा मोठा बिहार, परंतु त्यांत रहाणारे भिक्षु चारपांच असावयाचे ! येथें भिक्षूंना दानहि पुष्कळ मिळतें. चाठुर्मास्यांत पुष्कळ ठिकाणीं सार्वजनिक दान देण्यांत येतं. तेर्थे भिक्षूंना एकएक गडी बरोबर घेऊन जावे लागतें ! मी येथ ऊ सागर स्थविराच्या यैजर्यंत नांवाच्या विहारांत रहात होतों. हा विहार फार मोठा आहे. परंतु मी स्तूपाच्या जवळ एक लहानशी खोळी होती त्या खोलींत रहात असें. ज्या दिवशीं पाऊस नसे त्या दिवशीं दूपारी मी जवळच्या टॅकडीवर जाऊन बसत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now