सुभाषचंद्र बोस | Subhashchandra Bose

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Subhashchandra Bose by शेषराव मोरे - Sheshrao More

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about शेषराव मोरे - Sheshrao More

Add Infomation AboutSheshrao More

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
सुभाषचे आईवडील त्यांच्या घरातील नोकरांना आपल्या कुटुंबातील एक घटक मानत. त्यांचा ते कधीही अपमान करीत नसत. चाकर आणि मालक यांच्यात ते कधीही अंतर ठेवत नसत. या नोकरांशी सुभाष आणि त्यांच्या आईवडिलांचा संपर्क अतिशय घनिष्ठ होता. भविष्यात सुभाषबाबूंचे ठिकाणी जो मनमिाऊपणा सगव्व्यांशी आपलेपणाने वागण्याची वृत्ती आणि प्रेम हे गुण आले ते सुभाषबाबूंचे ठिकाणी या लहानपणाच्या संस्कारांमुके निर्माण झाले. सुभाषच्या ठिकाणी लहानपणी आणखी एक गुण होता. त्यांच्या लक्षात आले की कोणतीही गोष्ट घरात आली की त्यांची सारखी वाटणी करावी. कोणत्याही गोष्टीसाठी भांडणतंटा कधीही होत नसे. सुभाषचा संपूर्ण परिवार द्वेष स्वार्थीपणा यातून मुक्त असायचा. सुभाषबाबूंची आई जानकीदेवी ही अतिशय सत्शील आणि धर्मपरायण साध्वी होती. त्यांच्या धार्मिकपणाचा सुभाषच्या मनावर मोठा परिणाम झाला. सुभाष लहानपणापासूनच धार्मिक होता. भविष्यात सुभाषबाबूत त्याग आणि बलिदानाची भावना जागृत झाली ती सुभाषवरच्या धार्मिक संस्कारामुठेच. सुभाषबाबूंनी लिहिलेल्या पत्रातून सुभाषबाबूंच्या धर्मप्रीतीचा प्रत्यय येतो. १९१२ मध्ये कटकमध्ये त्यांनी आईला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की आज नवमी म्हणुन तू आज दुगदिवीच्या आराधनेत मग्न असशील. कदाचित या वर्षी पूजा खूप थाटामाटात संपन्न होत असेल. परंतु आई इतक्या वैभवाचे प्रयोजन काय ? ज्या पूजेत आम्ही भक्तीरूपी चंदन आणि प्रेमरूपी पुष्प यांचा उपयोग करतो तीच पूजा सर्वश्रेष्ठ समजावी. वैभवाच्या प्रदर्शनामुठे भक्ती लुप्त होते. यावर्षी एक दुःख राहिले ते जे दुःख आहे ते मोठे दुःख आहे साधारण दुःख नाही. यावर्षी मी गावात नसल्याने त्रैलोक्य पूजा मी करू शकलो नाही. सर्वदुः्ख- हारिणी महिषासुरमर्दिनी दुर्गादिवीच्या ज्योतिर्मयी मूर्तीचि दर्शन घेऊन डोल््यांचे सार्थक करू शकलो नाही. (पत्र क्र.१) आईला लिहिलेल्या एका पत्रात त्यांच्या आस्तिक्यबुद्धीचा बुद्धीचा आणि प्रगाढ देशभक्तीचा आविष्कार दिसतो. ते म्हणतात भारत ही ईश्वराची प्रिय भूमी आहे. परमेश्वराने या महान देशात लोकांच्या उद्धारासाठी पुनः्पुन्हा अवतार चेतले पापी लोकांना पापापासून मुक्त केले. प्रत्येक देशवासीयाच्या अंतःकरणात धर्मभावना आणि सत्य यांचे बीजारोपण केले. हे विचार एका किशोराचे आहेत. नेतार्जीचे कौटुंबिक जीवन पु




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now