पंडित जवाहरळाळ नेहरू | Pandit Jhavarlal Nehru

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pandit Jhavarlal Nehru  by बा. ह. कल्याणकार - Ba. H. Kalyankar

More Information About Author :

No Information available about बा. ह. कल्याणकार - Ba. H. Kalyankar

Add Infomation AboutBa. H. Kalyankar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
) प्रत्येक राष्ट्राने दुसऱ्याचे सार्वभौमत्व मान्य करावे. २) प्रत्येक राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा व प्रादेशिक एकात्मतेचा आदर राखावा. ) कोणत्याही राष्ट्राच्या अंतर्गत कारभारात दुसऱ्या राष्ट्राने ढवळाढवळ करू नयें. ) (४) दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करू नये. (५) सर्वांनी शांततापूर्ण सहजीवन उपभोगावे. या तत्त्वांना रशिया, चीन, ब्रह्मदेश या राष्ट्रांनी पाठिंबा दिला. १८ एप्रिल १९५५ रोजी बांडुंग परिषद झाली. या परिषदेत वसाहतवाद व साम्राज्यवादाचा धिक्कार करण्यात आला. अणुबाँबचा वापर बड्या राष्ट्रांनी करू नये, सर्व परतंत्र राष्ट्रे स्वतंत्र व्हावीत असे ठराव पास झाले. हा पंडितजींचा विजय होता. या शांतिकार्याबद्दल राष्ट्राध्यक्षांनी जवाहरलालजींना “ भारतरत्न “ ही सर्वोच्च मानाची पदवी अर्पण केली. डिसेंबर १९५४ मध्ये मा. टिटो यांचे भारतात आगमन. १९५५ 8 इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णा यांचे भारतात आगमन. लाओसचे राजकुमार व प्रधानमंत्री यांच्याबरोबर जिनेव्हा समझोत्यावर हस्ताक्षर. १८ सप्टेंबर रोजी मार्शल बुल्गानिन व खुश्‍्चेव्ह यांचे भारतात स्वागत. इजिप्तच्या पंतप्रधान नासेरची भेट व वार्तालाप. १९५६--२७ जून रोजी राष्ट्रमंडल परिषदेतील प्रधानमंत्र्यांच्या संमेलनात भाषण. या काळात काही काळ अर्थमंत्रीपद जवाहरलालजींकडे होते. चौ एन लाओशी भारत-चीन सीमावादावर बैठक. अमेरिका, कॅनडा व युरोपचा दौरा आणि संयुक्त राष्ट्र संघात भाषण. १९५७ जानेवारी दोन १९५७ रोजी दिल्लीत चौ एन लायशी चर्चा. पंचनलामा व दलाईलामा यांच्यासमवेत म. बुद्धाच्या १५०० व्या जयंतीत सहभाग. निवडणुकीनंतर १७ एप्रिल रोजी नव्या मंत्रिमंडळाची स्थापना. पुनःश्च पंतप्रधान. १९५८ झेकोस्लावाकियाच्या पंतप्रधानांशी वार्तालाप. पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंडितजींनी प्रदर्शित केली. पण सर्वांच्या आग्रहाखातर राजीनामा न देण्याचा निर्णय. १९५९ युगोस्लाव्हियाचे राष्ट्रपती व पंतप्रधान मार्शल टिटो यांच्याशी चर्चा. १९६० पुनःश्च चौ एन्‌ लायशी दिल्ली येथे भेट. १ मे रोजी ' महाराष्ट्र राज्या “ची स्थापना. १९६१ कॉमनवेल्थच्या पंतप्रधानांच्या संमेलनात सहभाग. रशियाचे अध्यक्ष खुश्चेव्ह यांच्याशी मुलाखात. गोवा स्वतंत्र झाला. १९६२ निवडणुकीनंतर नवे मंत्रिडळ स्थापन. पुनःश्च पंतप्रधान. ११




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now