भारतींच्या ळळित साहित्यकृती | Bhaaratiinchyaa Lalit Saahityakritii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaaratiinchyaa Lalit Saahityakritii by अरुण टिकेकर - Arun Tikekarपेरियस्वामी तूरन - Periyaswami Tooranसुब्रह्मण्य भारती - Subrahmanya Bharati

More Information About Authors :

अरुण टिकेकर - Arun Tikekar

No Information available about अरुण टिकेकर - Arun Tikekar

Add Infomation AboutArun Tikekar

पेरियस्वामी तूरन - Periyaswami Tooran

No Information available about पेरियस्वामी तूरन - Periyaswami Tooran

Add Infomation AboutPeriyaswami Tooran

सुब्रह्मण्य भारती - Subrahmanya Bharati

No Information available about सुब्रह्मण्य भारती - Subrahmanya Bharati

Add Infomation AboutSubrahmanya Bharati

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क्षिप्त चरित्र पुंषरा अशा रीतीने श्री. अर्विद आणि श्री. अय्यर यांची संगत भारतींना लाभली. लहान- यणापासून भारती पराशक्‍्ती देवीचे उपासक होते. येथे त्यांनी पराशक्तिदेवीवर अनेक संदर गीते लिहिली. कण्णन आणि मरुगन (_ कार्तिकेय) त्यांची परमआराध्य दैवते होती. त्यांच्या * कण्णन पाट्ट ' ला तमिळ साहित्यात अग्रस्थान मिळाले आहे. मृश्हनवर लिहिलेली गीतेही तितकीच चागली आहेत. '' चट्री निल्लादे-पो-पगये तुल्लो वरुगदुवेल (हे शत्रता ! माझ्याभोवती फिरू नकोस, शूलायध वार करण्यासाठी येत आहे ) ह्या पंक्तीवर व. वे. सु. अय्यर वंहद्ट खश होते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ह्या पंक्ती- तील प्रत्यक अक्षर लाखमोलाचे आहे. नोव्हेंबर १९१८ मध्ये पहिले महायुद्ध संपले. भारती पॉडिचेरी सोइन ब्रिटिशांनी व्यापलेल्या भारतखंडात परत आले. परंतु त्वरित सरकारन त्यांना कंद करून तुरुंगात डांबले. परंतु अनेक मित्रांच्या साह्यामुळे त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर भारती कडयम ह्या आपल्या गावात आले आणि काही काळ तेथेच राहिले. नंतर तेथन परत मदासला आले आणि पुर्ववत ' स्वदेशमित्रन * दनिकात काम करू लागले. भारतींची प्रकृती आता खप खालावली होती. ते अशक्‍त झाले होते आणि वेगळेच दिसू लागले होते. १५ नोव्हेंबर १९२० पासून * स्वदेशमित्रन्‌ 'मध्ये जवळ जवळ दररोज “ रसतिरट्ट ', * विनोदतिरट्ट्‌ ', ' टिप्पण्या ' आदि स्तंभांमधन भारती लेख लिह़ लागले. ह्यातील बहुतांश लेख उच्च विचारसरणी दाखविणारे होते अथवा स्वातंत्र्यासंबंधी वाचकांच्या मनात चेतना व जागती निर्माण करणारे होते. त्या वेळी भारती तिरुवल्लिरवेणीत राहत असत. ते नेहमी पार्थसारथीच्या नंदिरात जात असत आणि मंदिरातील हत्तोला मोठ्या प्रेमपूर्वक फळे आणि नारळ खायला देत असत. एके दिवशी उन्मत्त दशेतील त्या हत्तीने भारतींना वर उचलन जोरात जमिनौ- वर आपटले. भारतीच्या माथ्यावर आणि शरीरावर बर्‍याच गंभीर जखमा झाल्या होत्या. काही दिवसांनी जखमा भरून आल्या परंतु ह्या घटनेनंतर ते फार दिवस जगले नाहीत. त्यांची प्रकृती बिघडतच चालली आणि ११ सप्टेबर १९२१ ह्या दिवशी त्यांचा देहांत झाला. ज्यांनी आपल्या प्रतिभाशाली लेखणीद्वारा आणि असामान्य कवित्वशक्ती- द्वारा तमिळ भाषेत नवी जागती निर्माण केली अशा ह्या य॒गद्रष्ट्या कवी भारतींना अवघे अडतीस वर्षांचे आयर्मान लाभले. हृदयात उचंवळून येणाऱ्या उदात्त भावनांच्या ज्वालांना आणि भावनाविवशतेला काबत ठेवायला त्यांचे कृश शरीर असमधथे ठरल. भारतींच्या निधनानंतरच त्यांच्या कवितांना महत्त्व प्राप्त होऊन त्या प्रकशात.- आल्या. त्या काळो स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांच्या प्रत्येक सभेत भारतीची राष्ट्रीय गीते निनादत राहिली. त्यांच्या देशभक्तिपर गीतांनी जनताजनार्दन अस्वस्थ होऊन उठला. त्यांच्या गद्यशैलीत एक प्रकारचे नावीन्य होते, जणू संभाषण, वातचीतच होत अहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now