स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रन्थ | Svaamii Vivekaananda Yaanche Samagra Granth

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Svaamii Vivekaananda Yaanche Samagra Granth by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ द्वादहक कळमकर अह्मचारिणी तयार करण्याचा माझा मानस आहे. जन्मभर संन्यस्त वृत्तीने राहून खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करावयाचा अशी शपथ त्यांनी घेतली पाहिजे. अशाच रीतीनें ल्ियांनीं शिक्षणाचा प्रसार स्त्रियांत करावयाचा आहे. पण हें सारें कार्य आपल्या स्वदेशी पद्धतीनें झालें पाहिजे. संन्याशांकरितां असलेल्या मध्यवर्ती मठाप्रमाणेंच ब्रह्मचारिणींकरितांही मठ असावे. या मठांत उच्च दानतीच्या आणि सुविद्य ब्रह्मचारिणींनीं दिक्षणाचें कार्य करावें. स्त्रियांना आपलीं इतिहासपुराणें चांगलीं अवगत करून द्यावीं, त्यांना ग्रह- कृत्यें शिकविलीं पाहिजेत. मातेचें खरें कर्तव्य काय याची जाणीव त्यांना करून देऊन त्यांचें शील बनविणें ह्दें या संस्थांचें मुख्य कार्य असलें पाहिजे. अर्वाचीन शासत्रांना अचुसरून आरोग्यशासत्राची माहिती त्यांना करून देणें जसें इष्ट आहे, त्याचप्रमाणें सदाचार आणि धर्म यांजकडेही त्यांची प्रवृत्ति होईल असें शिक्षण त्यांना देणें अवश्य आहे. योम्य, काली. त्या. खरोखर सुमाता होतील, अशी काळजी आपण आरंभापासून घेतली पाहिजे. आपले अखेरचें ध्येय हेंच असावें; अशा सुमातांच्या पोटीं येणारी प्रजा सद्गुणी आणि सुमा्गवर्ती होऊन आपल्या देशाचें कल्याण साधील यांत शंका नाहीं. सुशील मातांच्या पोटींच महापुरुष जन्म घेत असतात; पण वुम्हीं. आज आपल्या छ्रियांची कशी दुर्दशा केली आहे पहा ! जणूं काय तीं प्रजोत्पादक यंत्रेंच ! तुम्ही पुरुष स्वतःस सुदिक्षित म्हणवितां, मग त्या विक्षणाचें हेंच फळ काय १ स्त्रीवर्ग आणि सामान्य जनता यांची उन्नति प्रथम झाली पाहिजे. असें झालें तरच हिंदुस्थान देश उन्नतीच्या मार्गाला लामेल. बोलतां बोलतां आम्ही चोरबागनपाशीं येऊन पोचलो, तेव्हां स्वामीजी शिष्याला म्हणाले * तपस्विनी माताजींनीं आपल्या महाकाली पाठालेंत मला बोलाविले आहे. ? आमची गाडी पाठशालेजवळ उभी राहिली. तेथें तीनचार सद्गृहस्थ पुढें आले आणि स्वामीजींना ते वरच्या मजल्यावर घेऊन मेले. तेथें दाराशींच स्वतः माताजी उभ्या होत्या. स्वामीजींचा आदरसत्कार करून त्यांना त्या आंतल्या दिवाणखान्यांत घेऊन गेल्या. या ठिकाणीं स्वामी- जींचें स्वागत करण्याकरितां कांहीं कुमारिका उभ्या होत्या. स्वामीजी आंत जातांच एक श्लिवस्तोत्र संस्कृतांत म्हणण्यास त्यांनीं सुरवात केली. पाठशाळेत शूजनाचा प्रकार कसा शिकवितात याचीही तालीम त्यांनीं करून दाखविली...




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now