महाराणा संग्राम सिंह | Maharana Sangramsigh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maharana Sangramsigh by काशीनाथ नारायण पटवर्धन - Kashinath Narayan Patavardhan

More Information About Author :

No Information available about काशीनाथ नारायण पटवर्धन - Kashinath Narayan Patavardhan

Add Infomation AboutKashinath Narayan Patavardhan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१४ महाराणा संग्रामसिंह. तुकांनीं परम पवित्र त्रजभूमींत देवस्थानांचा, गोब्राह्मणांचा व साधुसंतांचा जो छल मांडिला आहे, त्याचा प्रातिकार करण्यासाठीं हिंदु धर्माचे खरे अभिमानी जे राजस्थानचे शूर राणे, त्यांमध्यें धर्मवुद्धाची स्फूर्ति उत्पन्न करून ल्यांनां मीं येथें आणिले. आजमितीस मोहीम बरीच रंगांत आली आहे; परंतु अलीकडे राज- मंडळाची जीं कारस्थाने चाळू आहेत, त्यामुळें तो रंग पालटण्याची धास्ती वाढू लागली आहे. वास्तविक पहातां तुकांचा हछ्लींचा बादशहा बाबर अल्यंत नीतिमान व विचारी आहे; परंतु त्याच्या हाताखालचे अम्मलदार पडले जुन्या असदानींतले, अत्यंत जुलमी, अविचारी, हेकेखोर व हिंदूंचे कट्टे दुस्मान. शिवाय बाबरशहाला इकडील लोकस्थिति माहीत नसल्यामुळे आरंभीं या अम्मलदारांवर फानील भरंवसा ठेवणें त्याला भाग पडले. त्यामुळें “पिशाचाच्या हातीं कोलीत * अशी अवस्था होऊन त्यांचा “दीन” सर्वत्र हाहाःकार उडवूं लागला. एकंदरींत राजा . किती जरी सद्गुणी असला, प्रजेच्या कल्याणाची व तद्दारा देशकल्याणाची त्याला . कितीहि कळकळ असली, तरी जॉंपर्यंत मंत्रीमंडळाच्या स्वैर वततनाला तो आळा घालणार नाहीं, तोंपर्यंत त्याचे सर्व हेतु निष्कळच होतील. इतकेंच नाहीं, तर त्याच्या अधिकाराचा पोंचटपणा सर्व राष्ट्राला विंघातक होईल. ह्याच बाबरदहानें प्रथमारंभी थोडी दूररष्टि पोहोचवून देशस्थितीचा बिचार केला असता, हिंदू ह्मणजे केवळ रानटी लोक आहेत असें सांगणाराचे जिभेला चिमटा घेतला असता, व हिंदु धर्मांच्या ठायींहि कांहीं प्रखर तेञ असून व्या धमोसाठीं सुसलमानांप्रमाणेंच-किंबहुना त्यांच्याहूनहि जास्त त्वेषाने लढणारे लोक हिंडुस्था- नांत आहेत, एवढ्या गोष्टी जरी त्यानें ध्यानांत आणिल्या असत्या, तरी हक्लींसारखी स्वत:च्या इच्छेविरुद्ध लढाई चालवून असंख्यात प्राणहानीचें पातक शिरावर घेण्याचा प्रसंग त्याला कधींहि येता ना. इकडे रजपूतांचाहि प्रकार विलक्षण | राणा संग्रामासेंह जरी महान्‌ प्रतापी आहे, तरी त्याची महत्त्वाकांक्षाहि जबर आहे. तिच्या भरांत तो वाटेल त्याची मानहानि करितो. त्यासुळें इतर सर्व रजवाडे त्याच्या अधिकाराला नाराज होऊन त्यांपैकीं कांहीं प्रत्यक्ष द्यत्रूला आंतून सामील झाले आहेत. ह्या संबंधांत राण्याला दोन उपदेशाच्या गोष्टी सांगण्याचा माझा विचार आहे; परंतु आज तागायत त्याची व माझी भेट देखील नाहीं. इतकेंच नाहीं, तर मजबह्ल त्याचा अत्यंत गैरसमज झाल्याचेंहि माझ्या कानीं आलें आहे. साहजिकच आहे. तरवार्रावरच ज्याचा सवं भरंवसा, तो मजसारख्या बेराग्याच्या मसलतीला कसा मानील १ असो. आपल्या हातून होईल ती खटपट




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now