स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रन्थ ४ | Svaamii Vivekaanand Yaanche Samagra Granth 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Svaamii Vivekaanand Yaanche Samagra Granth 4 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खड ] कोलंबो-आल्मोरा व्याख्यानमाला. र दिला आहे, तो एका व्यक्तीला दिला आहे असें मी समजत नसून, तो मान आपण धर्मतत्त्वाला दिला असे मी समजतो. ” य क क्ष ता. १६ जानेवारी रोजीं फ़ोरल हॉल नावाच्या ठिकाणीं त्यांचें जाहीर च्याख्यान झालें.--- “ पाश्चात्य देशांत जो कांहीं कामगिरी माझ्या हातून झाली, ती केवळ माझ्या स्वत*च्याच सामथ्यांनें झाली नसून, मला जें प्रोत्साहन आणि जो आशीवाद माझ्या पवित्र आणि प्रिय मातूभूमीकडून मिळाला, त्यामुळेंच ही कामगिरी माझ्या हातून पार पडली. माझ्या पर्यटनानें, पाश्चात्य लोकांचाही काहीं फायदा झाला असेल ही गोष्ट खरी; तथापि मला स्वत*लाही फार मोठा लाभ झाला आहे यात संशय नाहीं. माझी मातृभूमि ही पुण्यभूमि आहे असें मला नित्य वाटत असे. केवळ जन्मभूमीच्या प्रेमापुळेंच मला प्रथम असें वाटत असेल, पण या पयेटनानंतर या गोष्टीबद्दल माझी पक्की खात्री झाली. यासंबधी माझी खात्री इतकी पक्की झाली आहे कीं, ज्या कोणास या गोष्टीबद्दल संशय असेल, त्याची संशयनिवृत्ति करण्याची माझी तयारी आहे हंदुस्थान ही पुण्यभूमि आहे असें हिंदुमात्रास वाटत असते, आणि मलाहि तसेच वाटे, यांत नवल काय १ पण त्या वेळीं या माझ्या “ वाटण्याला ' कांहीं महत्त्वाचा आधार नव्हता. आाज प्रत्यक्ष अलुभव घेतल्यानतर मी भापणासमोर उभा राहून बिनदिक्कत आणि प्रतिज्ञापूवेक म्हणतो कीं, हिंदुस्थान ही पूण्यभूमि आहे. पुण्यभूमि या नांवास पात्र अशी एखादी भूमि या जगतीतलावर असेल तर ती हिंदुस्थान हीच होय. आपापल्या कमाची पूर्तता करण्यास-आपल्या कर्माचे हिशेब पुरे करण्यास, या जगांतील सवे जीवात्म्यांनीं या भूमीक- डेच धाव घेतली पाहिजे. परमेश्वराकडे जाण्यास निघालेल्या प्रत्येक जीवात्म्याची अखेरची कर्मभूमि हीच. या भूमीत जन्म घेण्यानेच त्याला मुक्तिलाभ मिळल, जगांतील अत्यत मोठे सौजन्य, औंदाये, पावित्र्य आणि शांति याची अत्युच दशा या भूमीवांचून दुसऱ्या कोठेंही सापडणार नाहीं. अतमुखता आणि धर्म याचा वास जगांत जर कोठें असेल तर तो याच भूमीत आहे. अध्यात्मविद्येच्या जिवत झऱ्यातील ज्ञानजलाचा वर्षांव इतर देशांत करणारे मेघ येथूनच बाहेर पडले, पूवे, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या चारी दिशाकडे अध्यात्म-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now