सावरकर काव्य समाळोचन | Saavarakar Kraavya Samaalochan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saavarakar Kraavya Samaalochan  by वा. गो. मायदेव - Va. Go. Maydev

More Information About Author :

No Information available about वा. गो. मायदेव - Va. Go. Maydev

Add Infomation AboutVa. Go. Maydev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विनायकरावांतील काव्यगुणाचा परिपोष करण्याचा वांटा त्यांचे थोरले बँधु गणेशपंत यांच्या पत्नी सो. येघूताई यांच्याकडेही जातो. १८९६ त गणेशपंत यांचें ल्न झालें. महिला वर्गात प्रचलित असलेलीं ८०1९० गाणीं त्यांस पाठ येत असत व तींही विनायकरावांना कितीदां तरी ऐकावयास मिळाल्यानें सहजसुंदर भाव- निदशैनाची मौज या आह्यानांचे द्वारां त्यांनीं खूप अनुभविली होती. या काळांत विनायकराव थोड्या आर्याही जुळवूं लागले होते. परंतु हें त्यांचें लिखाण म्हणजे (एक प्रकारचा वाचनाचा व श्रवणभक्तीचा थोडा परिणाम होतें. त्याला शाक्रशुद्ध पाया नव्हता. या शाब्रशुद्धतेच्या अभावाची जाणीव एका प्रसंगानें त्यांचे ध्यानांत लीकरच आली. तो मनोरंजक प्रसंग असा. भगूर येथें असतांना कुळकर्णी या नांवाचा एक विद्यार्थी त्यांच्या वगात होता.. त्याला विनायकरावांच्या काव्यशक्तीबद्दल अचंबा वाटे. विनायकरावांच्या कवितांची वह्दी वाचीत असतांना एका शिक्षकाचें लक्ष या कुळकर्ण्याकडे गेलें. कसली वही वाचतो आहेस असें विचारतांच कुळकर्णी यानें विनायकरावांच्या कवितांची वही शिक्षकास दाखविली. शिक्षकाने तें काव्य वाचून पाहिलें. आंतील कवितांनीं तो स्तिमितही झाला. परंतु जरा असूया वाटली म्हणून म्हणा अगर निष्काळजीपणानें म्हणा त्यांतील दोषांचा नेमका उल्लेख करून, “काय रे विनायक, काय या भिकारड्या आर्या लिहितोस १ आर्येच्या पहिल्या पदांत बारा व दुसऱ्या पदांत अठरा मात्रा वेळेस विनायकरावांना मात्रा शब्दाचा ए या संयुक्त स्वराची खूण एवढाच अर्थ माहीत होता त्यामुळें ते फार बुचकळ्यात पडले. स्वभाव तर मानी पडला.. मोरोपंतांच्या कितीतरी आर्या त्यांस पाठ येत होत्या. पण त्यांतील कोणत्याही. आयेच्या प्रथम व द्वितीय पदांत शिक्षक्ानें सुचविल्याप्रमाणें १२ व १८ मात्रा त्यांस आढळेनात. अशा गोघळांत त्यांचे कितीतरी महिने गेले. शेवटीं त्यांना वृत्तद््पण हें वरच्या वर्गास लावलेलें पुस्तक पहाण्यास मिळालें व क्षणांत त्यांची चूक त्यांना कळून आली. हें सवे लिहिण्याचें कारण एवढेंच की, त्यांचे प्रथमचे कवितांत इत्तदोष. आढळ- ल्यास त्यांकडे त्यांचें लक्षच गेलें नसल्यामुळें ते झाले आहेत हें वाचकांच्या ध्यानांत यावें. परंतु विनायकरावांच्या याह्दी वेळच्या कविता कांहीं संपादकांनी छापल्या मचे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now