दोन शेर धान | DON SHER DHAAN

DON SHER DHAAN  by पुस्तक समूह - Pustak Samuhशिवशंकर पिल्लई - SHIVASANKARA PILLAI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

शिवशंकर पिल्लई - SHIVASANKARA PILLAI

No Information available about शिवशंकर पिल्लई - SHIVASANKARA PILLAI

Add Infomation AboutSHIVASANKARA PILLAI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
24 दोन शेर धान आतापर्यंत ज्याला गरज होती त्याच्याकडे तो रोजंदारीवर काम करीत होता! औणप्पणीमध्ये भाग घेतल्यानंतर तो मजूर राहिला नाही . त्याला आता दासाची योग्यता आही . त्यानं काय करायचं हे अगोदरच निश्‍चित झालेलं होतं . उद्या कोण बोलावील , काम कसं करावं लागेल वगैरेची काळजी करण्याची आता जरुरी राहिलेली नव्हती . आता त्याच्यावर ठरीव जबाबदाऱ्या पडल्या. होत्या . कामसुद्धा रोजच्या मजुरीसाठी करावं छागत नव्हतं . आता तो देशाछा जरून ते अन्न मिळविण्यासाठी काम करणारा होता . देशवासियांना अन्न देण्याकरिता काम करीत होता . ज्या शेतात तो काम करतो त्यात दुसर्‍या कोणत्याही शेतापेक्षा अधिक पीक निघाळं पाहिजे . याप्रमाणे कुट्टनाटच्या परयन व पुलयन यांच्यातील स्पर्धेची भावना साऱ्या राज्याचा दुष्काळ दूर करण्याछा उपकारक ठरली. असे विचार घोळू लागल्यावर कोरनला झोप कशी येणार! त्याच्यासकट सर्वच काम करणाऱ्या लोकांच्यात ही जबाबदारीची भावना नाही! हेच त्यांनी म्हटलं की नाही ! हे आपल्या प्रमुखानं ऐकलं असतं तर - कोरन उठला त्यानं कुञ्जप्पीला हाकं मारली . तो तरी कुठे झोपला होता? कोरननं जे ऐकलं होतं ते कुञ्जप्पीछा सांगितलं . कृञ्जप्पीला सुद्धा काही सांग्रायचं होतं . कुञजप्पीलासुद्धा ह्या शेतांपैकी एका मालक शेतकऱ्यानं काही ऐकवलं होतं . कोरनळा वाटत होतं की बांध न बांधळा जाणं माछकांना अपमानकारक आहे ! कुञ्जप्पीनं म्हटलं, “हं हं, तू तर अजून नवीनच आहेस ! प्रमुखाला थोडं डोकं किंवा अक्कल असेछ तरच काही काम होणार की नाही? त्यात्म काही समज तरी आहे का? नंतर भात्र कामाचे डोंगर उचलायला लागेछ . पण या प्रकारचा तम्पुरान शोधून सुद्धा सापडणार नाही! चैत्र महिन्यात धानाची मजुरी मोजायच्या वेळी पहा. आमच्या भांड्यात एक सुद्धा धान पडू देणार नाही! मोजण्याचं काम अशा रीतीनं होईल की सारं धान मालकाच्याच हिश्शात जाईल . आपल्या लोकांची धानाची मजुरी मोजण्याच्या वेळेस सगळे छोक मोजणाऱ्याला मनातल्या मनातच शाप देतात . एखाद्या वेळी पान खाण्याळाही त्यांच्यासमोर एक मूठ घेण्याची सोय नाही .” कोरननं म्हटलं , “हा, बांध ठीक करण्याचं काम आपण उद्याच का सुरू करू नये ?” कुञ्जप्पी कबुल झाल्य . मोठ्या पहाटे औसेप्पचे सर्व दास प्रमुखाच्या घरी गोळा झाले . काम काही एका पद्धतीनं झालं पाहिजे असं कोरननं म्हटलं असं केल्यानं शेती चांगली होते . कुञ्जप्पीनं दुजौरा दिला . शमयलचंसुद्धा हेच मत होतं . कोरनचा आणखी एक विचार होता. शेती करायची होती सहा शेतातं ! सर्वांनी मिळून काम करायचं असलं तरी प्रत्येकावर एकेका विभागाची जबाबदारी सोपवणं ठीक होतं . यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या दोन शेर धान 25 विभागावर लक्ष ठेवून आपापली जबाबदारी सांभाळील . शमयळ याच्याशी सहमत होता . त्यानं म्हटल -* मग ते आत्ताच ठरवून टाका . ” या गप्पांत भाग न घेता नारळाच्या झाडाखाली चादर पांघरून पडलेल्या चेंच्नन बोलला , “मी या प्रकारची कोणतीच जबाबदारी आपल्यावर घ्यायळा तयार नाही .” थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही . तेव्हा कोरननं विचारछ, “असं का? तू देखीळ पुष्पवेळीचा दास आहेस ना?” चेन्नन थोडा वेळ गप्प राहून बोलला, “एं पोरा, मी काही आताच दास बनलो नाही . बापजाद्यांपासून आम्ही. पुष्पवेळीचे ओणप्पणीकार आहोत . म्हणूनच मी सांगितलं की माझ्याकडून हे व्हायचं नाही ही गोष्ट कोरनच्या छक्षात आली नाही . “पिढीजात ' दास असल्यामुळे तर विशेष जबाबदारीनं काम सांभाळलं पाहिजे , ही अधिक महत्त्वांची गोष्ट नाही का? “पूंचा शेताचं पीक परयन व पुलयन यांच्याच मेहनतीवर अवछंबून असतं . आपण आपलं काम नीट करीत नाही म्हणूनच देशात दुष्काळ पडतो झ चेन्नननं हसत म्हटलं, “हो , हो , नवीन बिब्बी छण्रावरसुद्धा झाडू लावते !” अशाच तऱ्हेनं बोलाचाढी होत राहिली तर कोरन आणि चेन्नन यांच्यात जरूर झगडा होईल असं सर्वांना वाटलं . तसं होऊ नये म्हणून शमयलनं एकेक शेत. एकेकावर झोपून दिलं . नदीच्या काठावरच्या सहाशे पासऱ्या शेताची जबाबदारी कोरनवर सोपवली . चेन्ननसाठी कोणतंच शेत ठेवलं नव्हतं . वाटणी करताना त्याची संमतीसुद्धा घेतली नव्हती . त्याच्या उपस्थितीकडेही कोणी लक्ष दिलं नाही. चेन्चनन जरा ताठ होऊन बसल्या . पर्वतावरच्या हवेनं जणू त्याला जागं करून सशक्त बनवलं होतं . त्यानं हिशेब विचारण्याचा निश्‍चय केला . उ “ शमयलभाई , तुम्ही हे काय केलं?” “काय आहे रे?” . 3 “तुम्हीसुद्धा दुसऱ्यांच्याच सारखे झालात? आरुपरा घराण्यातील परयर हे पुष्पवेछीचेच दासं आहेत ना? कुठून वाहवत तर आलेछे नाहीत?” शमयलनं म्हटलं , “माहीत आहे मला “तसं असतं तर तुम्ही असं केळं नसतं . ही माझ्या तम्पुरानची शेती आहे हं ! बाहेरून आलेल्या लोकांवर तुम्ही शेताची जबाबदारी सोपवछी अन्‌ मर्ळी विसरछात ! आम्हीसुद्धा पुष्पवेळीचंच मीठ खातो आहो ना?” “माझ्याच्यानं होणार नाही असं तूच म्हटलं होतं ना?” “तसा तर कधी कधी तम्पुरानशीसुद्धा भांडतो मी'! कधी-कधी कामावरदेखील जात नाही ! तम्पुरान कधी-कधी मारतातसुद्धा ! वर्षभरात कमीतकमी दोनदा तरी मार खातो मी, हे तुला माहीत आहेच ! पण तम्पुरानच्या शेतात पीक काढायचं काम माझं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now