हजारी प्रसाद द्विवेदी | HAZARI PRASAD DWIVEDI

HAZARI PRASAD DWIVEDI by पुस्तक समूह - Pustak Samuhविश्वनाथ प्रसाद तिवारी - VISHWANATH PRASAD TIWARI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विश्वनाथ प्रसाद तिवारी - VISHWANATH PRASAD TIWARI

No Information available about विश्वनाथ प्रसाद तिवारी - VISHWANATH PRASAD TIWARI

Add Infomation AboutVISHWANATH PRASAD TIWARI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
24. हजारीप्रसाद द्विवेदी त्याच्या संयमाचे प्रतीक वा लक्षण म्हणता येईल. पशुत्वाची लक्षणे जरी त्याच्यामध्ये आहेत तरी माणूस त्यांचा त्याग करू पाहतो आहे. माणसाची स्वतःची ही मनौषा आहे, त्याचा आदर्श आहे. ह्याच प्रकारे मानवी समाजातली शख्राखे वाढवण्याची प्रवृत्ती पशुत्वाचे लक्षण आहे. पण त्यांच्या वाढीला पायबंद घालणे यातच मनुष्यता आहे. ट्विवेदी असेही मानतात की माणसाच्या शक्‍्यतांना तर सीमाच नाही. त्याची शक्‍ती अमर्याद आहे. तो कधीच पराजित होत नाही. पशुत्व त्याच्यात पुन्हापुन्हा प्रकट होते आणि माणूस पुन्हापुन्हा त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो. हीच माणसाच्या विकासाची कहाणी आहे. द्विवेदींची दृष्टी मुळात सांस्कृतिक आहे. साहित्यानंतर त्यांचे सर्वात जास्त निबंध संस्कृतीबद्दलचे चिंतन या स्वरूपाचे आहेत. त्यांच्या बहुतेक निबंधांमधून भारतीय संस्कृतीचे स्वरूप, सामर्थ्य, तिची बलस्थाने यांचे विश्लेषण झाले आहे. त्यांचे संस्कृती-प्रेम इतके तीव आहे की संस्कृतीसंबंधी विचार नाहीत अशी त्यांची एकही साहित्य-कृती नसावी. “अशोक के फूल', 'मेरी जन्मभूमे', 'हिमालय', 'ठाकुरजी की बटोर', 'भारतीय संस्कृति और हिंदी का प्राचीन साहित्य” , 'सभ्यता और सस्कृति', 'भारतीय संस्कृति की देन', भारतीय संस्कृति का स्वरूप' , संस्कृति ओर साहित्य”, 'संस्कृतियों का संगम', 'भारतवर्ष की सांस्कृतिक समस्या”, “हिंदू संस्कृति के अध्ययन के उपादान' इत्यादी निबंध तर प्रामुख्याने संस्कृतीविषयकच आहेत. संस्कृतीबद्दल त्यांची स्वत:ची स्वतंत्र, स्पष्ट अशी धारणा आहे. संस्कृतीला कुटल्या एकाच देशाची वा जातीची कुंपणे घालणे त्यांना मान्य नाही. त्यांचे म्हणणे असे की अखिल जगाच्या माणसांची मिळून अशी एक मानव-संस्कृती असू शकते. अशा व्यापक संकल्पनेमधली व्यापक संस्कृती आजवरच्या जगात माणसांनी ना अनुभवली आहे, ना अंगीकृत केली आहे ही गोष्ट वेगळी. संस्कृतीच्या संदर्भात पौर्वात्य वा पाश्चिमात्य, भारतीय-अभारतीय अशी कृत्रिम विभागणी द्विवेदीना स्वीकार्य वाटते नाही. त्यांच्या मते कोणतीही संस्कृती या विश्वात उद्गम झालेल्या सत्याच्या विरोधात नसते. त्यांच्याच शब्दात : उ नाना ऐतिहासिक परंपरा, तऱ्हेतऱ्हेची भौगोलिक परिस्थिती, यात जीवन जगून जगाच्या पाठीवरच्या भिन्नभिन्न समुदायांनी त्या महान मानवी संस्कृतीच्या भिन्नभिन्न अंगांचे, पैलूंचे दर्शन घडवले आहे. हरतऱ्हेच्या धार्मिक साधना, कलात्मक प्रयत्न यांमधून, तसेच सेवा, भक्ती आणि योगाच्या अनुभूतीमधून देखील माणसाला 'त्या हान सत्या च्या व्यापक आणि परिपूर्ण रूपाची प्राप्ती हळूहळू होत चालली आहे, 'ते सत्य' कोणते तर जे आपण ' सस्कृती' या शब्दाने व्यक्‍त करतो ते”” सभ्यता' आणि 'संस्कृती' यांच्यामधला फरक स्पष्ट करताना द्विवेदी लिहितात : ' सभ्यतेच्या अंतर्मनावसील म्हणजेच आंतरिक प्रभावाला संस्कृती म्हणता येईल. शाणसखाच्या बाह्य व्यवस्थां'चे नाव सभ्यता. तर व्यक्‍तीच्या आंतरिक विकासाचे 1. “भारतीय संस्कृती को दन शोक क्लेबय संस्कृती की देन' शीर्षक निबंध. निर्बंध लि 25 नाव संस्कृती. सभ्यता वर्तमानामधल्या सोयी, गैरसोवींवर दृष्टी ठेवून असते. क दृष्टी भविष्य किंवा भूतकाळातल्या आदर्शावर असते. सभ्यता जवळच्या 7 ल $ , तर संस्कृती दूरपर्यंतच्या. व्यवस्थेवर लक्ष ठेवून असते ती सभ्यता. तर संस्कृ कअ लक्ष व्यवस्थांच्या भूतकाळावर, व्यतीत झालेल्या काळातील विषयांचे व उ 'सभ्यते' च्या कक्षेत कायदा ही माणसाहून मोठी गोष्ट असते. पण बा दृष्टीने माणूस कायद्याच्याही पलीकडे आहे. सभ्यता माणसाच्या आहह असल्या चंचल आहे. संस्कृती मात्र आंतरिक आणि म्हणून स्थायी असते ह याआधी म्हटल्याप्रमाणे, एखाद्या देशार्ची वा जातीची 'विशुद्ध अशी च संस्कृती असते असे द्विवेदी मानतच नाहीत. भारतीय संस्कृतीबद्दलही ते याच दृ च विचार करताना दिसतात. “अशोक के फूल' या निबंधात उ त्यांनी म्हटले आहे का भारतवर्ष हा एक विचित्र देश आहे. रवीन्द्रनाथांनी त्याला *महामानवसमुद्र' म्हट ब इथे असुर, आर्य, शक, हूण, नाग, यक्ष, गंधर्व... कोणास ठाऊक किती जान येऊन वसल्या व एकमेकांत मिसळून गेल्या. ज्याला टा हिंदू रीती नीती' समज ती अनेक आर्य आणि आर्वेतरांच्या समावेशांचे, स्वीकारांचे अद्‌भुत मिश्रण, मीलन आहे. ज्याला आपण आजचा भारतवर्ष म्हणतो तो नाना जाती, धर्म, संस्कार, रीतिरिवाज यांचा एक जिवंत समन्वय आहे. द्विवेदींच्या म्हणण्यानुसार, 3 का संस्कृतीने भिन्नतेची समस्या, अमेरिकेत ज्या तऱ्हेने ती सोडवली गेली त्या तऱ्हेने सोडवली नाही. अमेरिकेत प्रवासी म्हणून आलेल्या युरोपियन लोकांनी त्या वेळी स्थानिक आदिवासींना अत्यंत क्रूर निर्दयतेने चिरडून त्यांचे तेथील अस्तित्वच संपवून टाकले. जी 'सभ्यता”वा व्यवस्था सर्वांना मारपीट करून दंडुकेशाहीने ल करू पाहते तिच्या अंतरंगातच दुभंगलेपण (बहुत्व) असते आणि रक्तात भिनलेलं असतात भेदभाव, द्वेष, घणा व तिरस्कार. भारतीय 'संस्कृती'च्या प्राणातच एकत्व आहे आणि रक्तात सहानुभूती. अगदी याच कारणामुळे आज वा देशात हजारांहून अधिक समाज एकमेकांना अडचण न ठरता निर्विघ्लपणे आपापल्या वैशिष्ट्यांसह जिवंत ते आहेत.'** न सर्वोत्तम ते प्रकाशित करण्यास समर्थ आणि साहाय्यक आहे ती खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती असे द्विवेदी मानतात. आपल्या विशिष्ट भोगोलिक परिस्थितीच्या ब ऐतिहासिक परंपरांच्या चौकटीत राहून या देशातील जनतेने माणसामधले जे सर्वोत्तम त्याला बाहेर काढून प्रकाशात आणण्यासाठी क केले. आणि हे प्रयत्न, जितक्या प्रमाणात जगातल्या अन्य माणसांच्या प्रयत्नांशी ल मिळते- जुळते आहेत, अविरोधी आहेत तितक्याच प्रमाणात ते त्या महान न संस्कृतीचा एक भाग, अंश आहेत असे द्विवेदी मानतात. भारताने जगातील सर्व देशांना आपल्या धर्म-साधनेची श्रेष्ठ मूल्ये दिली आहेत. अहिंसा व मैत्री यांचा संदेश दिला आहे. 1. 'सभ्यता और संस्कृति' शीर्षक निबंध. 2. 'सभ्यता और संस्कृति' शीर्षक निबंध.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now