नामदेव | NAMDEV
 Genre :बाल पुस्तकें / Children

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
1 MB
                  Total Pages : 
31
                  Genre : 
              Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

माधव गोपाल देशमुख - MADHAV GOPAL DESHMUKH
No Information available about माधव गोपाल देशमुख - MADHAV GOPAL DESHMUKH
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रकरण 2
कर्तृत्व आणि तत्त्वज्ञान
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया
नामा तयाचा किंकर । तेणें केलासे विस्तार ॥।
-संत बहिणाबाई
निरनिराळा संतांच्या थोर कृपेमुळे महाराष्ट्रात भागवतधर्माची अर्थात
वारकरी पंथाची मृहूतमेढ रोवली ग्रेली. त्याचा पाया घालून ते धर्ममंदिर
स्थापण्याचे श्रेय संत ज्ञानदेवांना जसे आहे त्याप्रमाणे त्यांचा किकर जो नामदेव
त्याला या धर्ममंदिराचा विस्तार करण्याचे श्रेय दिले पाहिजे. किंकर या शब्दाचा
अर्थ किम् करोमि ?' म्हणजे मी काय करू, असे म्हणून सतत कार्यतत्पर
असणारी व्यकती, भसा आहे. नामदेव हा भागवतधर्मख्पी देवालयात दी्घेकाल-
पर्यंत सतत सेवा करणारा भकत हीता म्हणूनच त्याला भागवतधर्मांचा एवढा
विस्तार करता आला.
एखाद्या संस्थेची स्थापना होताना तिची पायाभरणी अनेकांचे हातभार
लागून होतं असते. पण कालान्तराते तिला भव्य आणि व्यापक स्वरूप आल्यानंतर
तिचा मळ संस्थापक कोण, याबद्दल सर्वसामान्य लोकांत वाद उत्पन्न होतात.
महाराष्ट्रातील भागवतधर्म किवा वारकरी संप्रदाय यांच्या संस्थापनाचे श्रेय
कुणाला द्यावे, याविषयीही थोडा वाद झालेला दिसतो. वास्तविक पाहता या
घर्ममंदिराचे कळस समजले गेलेले संत तुकाराम यांची शिष्या बहिणाबाई हिने ही
श्रेयनामावली वर दिलेल्या रूपकात्मक अभंगात अतिशय भामिकपणे सांगितली
आहे. तीच आजही प्रमाण मानली पाहिजे. तिच्यात बदल करण्यासाठी आज काही
. नवा पुरावा उपलब्ध झाला आहे असे दिसत नाही.
तेच्वज्ञानाची बेठक
ज्ञानेश्वरांनी भागवतधर्माचा पाया घातला हे एवढ्याच अर्थाने म्हणावयाचे
की त्यांनी या धर्माचे मुलतत्त्व 'ज्ञानेशश्वरी 'त सलगपणे मांडून दाखविले.
कर्तत्व आणि तत्त्वज्ञान 23
वास्तविक भागवतधर्माचे मूळ ज्ञानदेवांच्याही आधी प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात
विशद केलेले आहे. ते ज्ञानदेवांच्या एकाच ओवीत सांगावयाचे भ्हणजे
जं जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत
हा भक्तियोग लिश्चित । जाण माझा ।।
सर्व भूतमात्राच्या ठिकाणी भगवःडट्राव मानणे हा जो भक्तियोग तोच
भागवतधर्म होय.
नामदेवांच्या तत्त्वज्ञानविषयक उद्गारांचा आढावा घेतल्यास त्यांना या
भागवतधर्माचे जे रहुस्य आकलन झाले ते पुढीलप्रमाणे मांडता येईल :
सर्व जगाच्या मुळाशी असलेले तत्त्व म्हणजे ब्रह्म होय व ते एकच आहे.
एकचि हें तत्त्व एकाकार देशीं । एक तो नेमेसि सर्वंजनीं
ऐसे ब्रह्म पाहा आहे सवं एक । न लगे तो विवेक करणें कांहीं
मिथ्या हें डंबर माया मथितार्थ । हरी हाच स्वा वेगीं करीं
नामा म्हणे समथ बोलिला तो वेद । नाहीं भेदाभद ब्रह्मपणीं
॥। 1607 ।॥।
सर्वांच्या अंतर्यामी व्यापून असलेले ब्रह्म हे सत्य असून वरवर दिसणारा
पसारा ह्य मिथ्या आहे. हे सवं वेदांचे मूलतत्त्व असलेल्या या तत्त्वाचे वेदांनाही
पुरेसे आकलन झालेले नाही.
वेडावली वाचा वेदांची बोलता । देवा पाहूं जातां अनिर्वाच्य
अनिर्वाच्य वाचा बोलावया गेली । जिव्हा हे चिरली भूधराची
भूधराची जिव्हा झालीसे कृंठित । तामा म्हणे अंत नलगे त्याचा
0 383 ॥
ज्याचे वेदांना देखील आकलन झाले ताही, सहस्र जिव्हा असलेला
शेषदेखील ज्याचे वर्णन करताना कुंठित झाला, त्या ब्रह्माचे आकलन करण्याचा
उपाय कोणता *
ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त । कारणरह्त निरंजन
ते आम्ही देखीले चममंचक्ष दृष्टी । उभा वाळवंटीं पंढरिये
वेदां अगोचर तयां सहसत्रमुखा । तें झालें पंडलिका लोभावर
परतल्या श्रुति म्हणती नेति नेति । आम्हां गातां गीतीं सापडले
स्वरूपाचा निर्धार बोलती पुराणें । शिणलीं दरुशनें वेवादिती
लामा म्हणे यांसी भावचि कारण । पावाबया चरण विठोबाचे
11 390 ॥।
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...