असे घडले शास्त्रज्ञ | BRIGHT SPARKS - INSPIRING INDIAN SCIENTISTS
 Genre :बाल पुस्तकें / Children

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
6 MB
                  Total Pages : 
109
                  Genre : 
              Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :
अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA
No Information available about अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)गहून समाजातील कमजोर घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले.
त्यांच्या लाडक्या विद्यार्थ्यांनी त्यांना 'आचार्य' ही पदवी बहाल केली होती.
१९१९ मध्ये त्यांना 'सर' हा बहुमान मिळाला. तसेच १९३४ मध्ये 'लंडन
केमिकल सोसायटी 'चे सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले. अनेक
विश्वविद्यालयांनी त्यांना अनेक सन्मान देऊ केले. १९२४ मध्ये नव्याने स्थापन
झालेल्या इंडियन केमिकल सोसायटीने त्यांना प्रथम अध्यक्षपद दिले.
सी. व्ही. रामन हेसुद्धा पी. सी. शय यांच्या समवेत त्याच संस्थेत प्राध्यापक
होते. रामन यांना नोबेल पारितोषिक मिळण्याच्या बरेच दिवस आधीच त्यांचे कौतुक
करताना राय म्हणाले होते, विज्ञानाच्या या मंदिरात असा एखादा रामन जरी तयार
झाला, तरी त्या मंदिराच्या संस्थापकाच्या उच्च अपेक्षांची पूर्ती होण्याचे समाधान
मिळेल.
प्रफुल्लचंद्र राय यांनी आपल्या तरुणपणात भारताचे जे स्वरूप पाहिले होते,
त्यापेक्षा १६ जून १९४४ या दिवशी, त्यांच्या मृत्यूसमयी, भारताने व भारतवासियांनी
जी प्रगती केली होती त्यामुळे ते समाधानी होते. त्यांची काही स्वप्ने नक्कीच पूर्ण
झाली; पण भारताचे स्वातंत्र्य हे त्यांचे सर्वात मोठे स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ
शकले नाही. पण त्यांनी प्रशिक्षित केलेल्या, उत्साहपूर्ण रसायनशास्त्रज्ञांच्या नव्या
पिढीने स्वतंत्र भारतात त्यांचे कार्य जोमाने चालु ठेवले. ह्या सर्व शास्त्रज्ञांची नवी पिढी
त्यांचे क्रण कधीच विसरू शकणार नाही. ते राय यांना भारतीय रसायनशास्त्राचे जनक
मानतात. १९४४ मध्ये त्यांना श्रद्धांजली वाहताना निचर॑ या मासिकाने एका लेखात
म्हटले होते, गेल्या पन्नास वर्षांतील भारतातील वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रात व
वैज्ञानिक प्रगतीत सर प्रफुल्लचंद्र य यांचा सगळ्यात मोठा व मोलाचा हिस्सा होता.
२० । असे घडले शास्त्रज्ञ
)))1(3/3/(2€969 ६८
अ
रूचीराम साहनी
(१८६३-१९४८)
 
रूचीराम साहनी हे शिक्षणतज्ज्ञ होते. पंजाबच्या दुर्गम भागात बविज्ञानशिक्षणाचा
प्रसार करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. ५ एप्रिल १८६३ कि
रोजी पाकिस्तानमधील डेरा इस्माईल खान या लहान
गावात त्यांचा जन्म झाला. वयाच्या पाचव्या-सहाव्या
वर्षी काही जुजबी शालेय शिक्षण घेतल्यानंतर,
व्यावहारिक शिक्षणासाठी त्यांना दुकानात व एका
व्यावसायिक पेढीवर पाठविण्यात आले. त्यानंतर
वयाच्या नवव्या -दहाव्या वर्षी त्यांनी आपल्या
वडिलांच्या दुकानात कामाला सुरुवात केली.
रूचीरास साहनी यांच्या आत्मचरित्रातून-
जे पाढे मी अस्खलितपणे बिनचूक म्हणून दाखवू शकत असे, त्या
प्रत्येक पाढ्यासाठी पाझे वडील माझ्या मास्तरांना ४ आणे देत असत.
प्रत्येक मुलासाठी जी फी द्यावी लागत असे त्याव्यतिरिक्त हे बक्षीस
असे. ती फी असे क जा न एकदा थोड़े पीठ व गुळाचा खडा,
मला २०५ ३५ पर्यंत पाढे व -नियकी (अपूर्णाक)चे पाढेही
तीँडपाड होते. र
ते शिक्षण संपल्यानंतर एका साध्या टुकानात मी महिना-दोन महिने
काम केले. त्या कामात मी शिकलेल्या पाढ्यांचा व थोडाफार
अंकगणिताचा उपयोग करावा लागे. माझ्या आठवणीतुसार मला
किमती काढण्यांत किंवा हिशेबात कधी फारसा त्रास झाला नाही,
रोजच्या दैनंदिन व्यवहारात आपण शिकलेले गणित व पाढे यांचा
उपयोग कसा करता येईल ते कळावे, हाच यामागचा उद्देश असावा.
पाढे हे केवळ घोकंपट्टी करण्यासाठी नसून त्यांचा उपयोग रोजच्या
व्यवहार्त होतो. हिशेबात काही चुका झाल्या तर धंद्यात बरेच ुकसान 1: पभ
होऊ शकते. हिशेब करण्याचे काम बिनचूक व पटापट करावे लागते. 1३8 मिमि
					
					
User Reviews
No Reviews | Add Yours...