द स्टोरी ऑफ़ स्टफ | STORY OF STUFF

STORY OF STUFF by अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTAपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

No Information available about अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

Add Infomation AboutARVIND GUPTA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
या प्रवाहात त्यांनी सगळयांनाच कस ओढून घेतले? त्यासाठी दोन परिणामकरक धोरण त्यांनी अवलंबिली.एक योजनाबध्द नाशवंत वस्तू तयार करणे व दुसरे समजून उमजून बाजूला टाकणे.पहिल्या प्रकरात त्याची रचनाच अशी असते की ते लवकर कचरापेटीत कसे जाईल याचा विचार केला जातो. उत्पादन जास्तीत जास्त हलक्या प्रतीचे कसे होईल जेणेकरून ग्राहक लवकरच ते फेकून देऊन नवे खरेदी करेल ही पुरेपुर काळजी घेतली जाते.प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा कॅफीचे कप या बाबतीत एकवेळ ठीक आहे,पण आता अनेक मोठया वस्तूंबाबतही उदा. डी.व्ही.डी.,कॅमेरा,शेगडया इ.वस्तूही यातच मोडतात. अगदी कॉम्प्युटर सुध्दा!आपण नवा कॉम्प्युटर घेतो तेव्हा एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे क? तंत्रज्ञान इतकेझपाटयाने बदलत आहे की आताचे नवे कॉम्प्युटर जे संपर्क चे मुख्य साधन बनले आहेत व सारखे नवनवे येत आहे म्हणून उत्सुकतेपोटी मी एक मोठा डेस्कटॉप कॉम्प्युटर उघडून पाहिला. माझ्या असे लक्षात आले की,दरवर्षी नवीन बनवताना त्यातील फक्त एक छोटासा भागच बदलला जातो.पण तुम्ही तेवढाच एक भाग बदलू शकत नाही,करण येणारे प्रत्येकमॉाडेल वेगळया आकाराचे असते.त्यामुळे तुम्हाला संपूर्ण कॉम्प्यूटर च फेकून दयावा लागतो.व संपूर्णच नवीन घ्यावा लागतो. १९५०च्या सुमारास या जगातील योजनाबध्द कंडम माल बनविण्याचे जोरात चालू होते,तेव्हाचे औदयोगिक डिझाइन जरनल मधील कही वाक्ये मी वाचली.हे डिझायनर हे उघडपणे जाहीर करतात.वस्तू लवकर कशी मोडीत निघेल,या तऱ्हेची बनेल हे ते आपसात चर्चा करून ठरवितात,तरिही त्या उत्पादनाविषयी ग्राहकला विश्‍वास निर्माण झाला पाहिजे व त्याने नवी वस्तू खरेदी केली पाहिजे.हे सगळे मुद्दाम घडवून आणले जाते. पण ज्या वस्तू खूप लवकर निकलात निघत नाहीत त्यांच्यासाठी असे उपाय आहेत की वस्तूचा उपयोग शिल्लक असतानासुध्दा ती फेकून देऊन दुसरी घेण्याची इच्छा होणे-निर्माण करणे हे सर्व जाणून बुजून केले जाते. हे कसे साध्य होते?तर वस्तूचे बाहय स्वरूप बदलवले जाते.त्यामुळे तुम्ही एखादी वस्तू कही दिवसापूर्वी खरेदी केलेली असेल असेल तर तुम्ही आधुनिकतेच्या प्रवाहात समाविष्ट नाही आहात हे कोणीही सागू शकेल,करण त्यावरच तर तुमची समाजातील पत ठरत असते हे कोणीही सांगू शकेल,करण त्यावरच तर तुमची समाजातील पत ठरत असते.हे सर्व नामुष्कीचे आहे. माझ्याकडे माझा जुना जाड -जूड कॉम्प्युटर होता.मी तो पवर्ष वापरत होते.माझ्या बरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्याने नवा कॉम्प्युटर घेतला होता.त्या कॉम्प्युटरला शोभेसा छान चपटा,चकचकीत स्क्रीन असलेला मॉनिटर होता.एवढेच कय त्याला हुबेहुब साजेसा तिचा फेन होता व पेनस्टॅडसुध्दा त्याला मॅचिंग होता.ती एखादया स्पेस-शिपमधे बसली आहे व मी मात्र एकभले मोठे वॉशिंग मशीन टेबलवर ठेऊन बसले आहे असेच वाटत होते. एखादी फॅशन हे याचे ठोक उदाहरण आहे.बायकंच्या बुटाच्या टाचा एखादया वर्षी चागल्या उंच असतात तर पुढच्या वर्षी सपाट असतात.यात आरोग्याच्या दृष्टीने कय चागले हा विचार नसतो तर फॅशनचाच प्रवाह असतो .फॅशनप्रमाणे तुम्ही बदलत नसाल तर बाजुच्या फॅशन पाळणाऱ्या माणसाच्या तुलनेत तुम्हाला कमी लेखले जाते.त्यामागे हेतू एकच नवीन जोडे खरेदी करत रहा.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now