कालिदास | Kaalidaasa

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Book Image : कालिदास  - Kaalidaasa
[adinserter block="2"]

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about वासुदेव विष्णु मिराशी - Vasudev Vishnu Mirashi

Add Infomation AboutVasudev Vishnu Mirashi

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
अश्वघोष व कालिदास १९होऊन गेलेल्या महत्त्वाच्या गोष्टींचें टांचण करून ठेवण्याचा प्रधात होता. अशा प्रकारचें कलिगदेशच्या खारवेल नांवाच्या राजाच्या कारकीर्दीचें सवि- स्तर वर्णन हाथीगुम्फेमध्यें खडकांवर को रलेलें प्राचीन इतिहासाच्या अभ्यास- कांस माहीत आहे. अशा भ्रकारचे शुगराजाच्या कारकीर्दीचि वृत्तांत कालि- दासकालींही शुग व गुप्त या दोन्‍्ही राजांची राजधानी झालेल्या पाटलिपुत्र शहरी अस्तित्वांत असणें व ते गृप्तककालीन कालिदासास उपलब्ध होणें असंभवनीय नाही. ह (४) अश्वघेषषाच्या ग्रंथांतीर साम्य---इ. स. १८९३ मध्यें अश्वधोषाचें .'बुद्धधरित”' व इ. स. १९१० मध्यें त्याच कवीचें 'सौंदरनंद' प्रसिद्ध झाल्यापासून विद्वानांचें लक्ष या काव्यांत व कालिदासाच्या ग्रंथांत दिसणान्या साम्याकडे वल्लें व त्यांच्यांत दोन तट पडले, प्रो. कोवेल सारख्या युरोपीय व कांही हिंदी संशोधकांनी, या साम्यावरून कालिदासाने आपल्या कल्पना अध्वधोषाच्या काब्यांतून घेतल्या, अर्थात्‌ तो त्यानंतर म्हणजे इ. स. च्या पहिल्या शत्तकानंतर* होऊन गेला, असें मानलें, तर उलट प्रो. शारदारंजन रे, प्रो. चट्ठोपाध्याय वर्गरेंनी अश्वधोषानेच कालि- दासाच्या कल्पना चोरल्या असें दाखबून खस्थिस्तपूर्व पहिलें शतक हा कालिदासाचा काकछ निश्चित करण्याचा प्रयत्न केला. या वादाचा विचार करण्यापूर्वी एक गोष्ट ध्यानांत घेतली पाहिजे, ती ही की यांपेकी कोणतें ही मत सिद्ध झालें तरी त्यामुछें त्यांपफी कोणाही कवीच्या अभिमान्यांस बाईट वाटण्याचें. कारण नाही. कारण राजशेखराने म्हटल्याप्रमाणें ' सर्वोषषपि परेभ्य एवं व्युत्पद्यते, प्रत्येक ग्रंथकार पूर्वजांचें भांडवल घेऊन व्यापार करीत असतो. तेव्हा मिविकार मनाने या दोन कवींचें कालदृष्टया पौर्वापर्य ठरविण्याकरितां या साम्यस्थलांचा विचार करण्यांत अडचण पैऊं नये. हैं साम्य दोन प्रंकारनें आहे--प्रसंगसाम्य व शब्दार्थोक्ति- साम्य. पैकी पहिल्याचा विचार करंतां अशीं कांही साम्यस्थक्ें अध्वधोषासेंकब्ज# अश्वघोष हा सुप्रसिद्ध कुशानवंशाय सम्राट कानिष्क याचा समकालीन हाता. पुष्कल हिंदी व युरोपीय विद्वानांचे मतें कनिष्काने इ. स. ७८ भध्यें सुरू होणारा सध्याचा शालिवाहन शक स्थापला, यावरून अश्वघोषाचा फाछ खिस्तोत्तर पाहिलें शतक हा धरला आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now