उजळत्या दिशा | Ujalatyaa Disha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ujalatyaa Disha by विनायक दत्तात्रय साळगांवकर - Vinayak Dattatraya Saalgaonkar

More Information About Author :

No Information available about विनायक दत्तात्रय साळगांवकर - Vinayak Dattatraya Saalgaonkar

Add Infomation AboutVinayak Dattatraya Saalgaonkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ण “ म्हणज १” अनामिका एकदम चपापली. “ म्हणजे १” दमन क्षणभर गोंधळून उत्तरला, “म्हणजे मी आहेबाबांच्या कायदेशीर लग्नापूर्वी जन्माला आलों. माझ्या जन्माच्यावेळीं आई अविवाहित ह्दोती. ” अनामिका व्याकुल य़ुद्रा करून आश्चयाने ऐकत होती. दमन उद्वेगाने पुढ म्हणाला, “* विलायतेहून आल्यावर बाबानीं आईवर खोटे आरोप करून लग्न करण्याचं नाकारलं, पण आमच्या लक्ष्मीआजीनं त्यांना कोर्टात खेचण्याचं भय घाळून तो विवाह घडकून आणला. पण असा सक्तीचा विवाह छचित्‌च सुखावह होतो. जुन्या माणलांना वाटतं तुटलेला दुवा तसाच बळकटपरणे जोडतां येतो, त्यांना कुठं कल्पना होती, कीं एकदां पाणी गेले कीं सांखळी तिथंच तुटण्याचा संभव असतो ही १ शिवाय आजीनं एवढा अट्टहास केला याचं कारण आईचा सामाजिक दर्जा काय राहील, माझा असंमत पुत्र हा दर्जा ठरेल असं वाटलं तिला. पण बाबांना आईबद्दल प्रेम वाटेना आणि दोवटीं या विवाहाचा शेवट हा असा भयंकर झाला. बाबानीं आईचा त्याग केला. अब्रसाठीं आजोबा कोर्टाची पायरी चढले. बाजू अगावर उलट लागतांच कोर्टांचा निकाल होण्यापूर्वीच बाबानीं आत्महत्त्या केली आणि समाजाची सहानुभूति मिळवून आपल्यातफ समाजाचा निकाळ मिळविला व आईवर लोकापवादाचा कायमचा शिक्का मारला. ” दमन खिन्न होऊन कांहीं काल स्तब्ध राहिला. अनामिका अंश्र पुसून दाटलेल्या स्वरांत म्हणाली, “दादा, अजून- पयंत मी किती सुखी होते!” शा न “ ताट, पण हा फटलेल्या नैकितील जल-विहार होता. अशीच बेसावध राहिली असतीस तर एकाद्या दिवशीं ठार बुडाली असतीस. अग अत्र जाऊं नये म्हणून एका बाजूनं बांध घालावे तर दुसऱ्या बाजूनं ती डुप्पट जोरानं जाऊं लागते. आजोबा आणि आजी यांनीं अन्नरक्षणार्थ ालविलेले प्रयत्न फोल ठरून त्यामुळेंच आमची बेअब्रू जास्त झाली. ”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now