बाळकवीची समग्र कविता | Baalakaviichii Samagra Kavitaa

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
12 MB
                  Total Pages : 
251
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about भा. ळ. पाटणकर- Bha. L. Patanakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)११
खंडकाव्य लिहावयाचे होतें. मंगल वाद्यांच्या आवाजांत त्या काव्याचा नायक एका
गडावरून उतरत आहे अशी त्या काव्याची सुरवात व्हावयाची होती.
बालकवींच्या आयुष्याला परिस्थितीने कलाटणी मिळाली नसती तर नुसती
हीच कविता काय पण महाराष्ट्राच्या इतिहासांतील विविध प्रसंगावर त्यांनीं
चित्तव्त्त थरारून सोडणाऱ्या ऐतिहासिक कविता लिहिल्या असत्या असें त्यांच्या
कांहीं अपूर्ण कवितांवरून वाटतें. पण अम्तरावांनीं ज्वलज्हाल राजकारणाचा
अवलंब केल्यामुळें त्यांच्या पाठीमागें पोलिसांचा ससेमिरा सुरू झाला. कधीं कधीं
सी. आय. डी. च्या लोकांनीं बालकवींकडेही आपली मेहरनजर फिरवली. अम्त-
रावांच्या कांहीं मित्रांना वेषांतर व देशांतर करावे लागलें. याच सुमारास त्यांचे
वडील दिवंगत झाले. संसाराचा बीजा अंगावर पडला. सांपन्तिक स्थिति बेताचीच
त्यामुळें मन व्यग्र झालें. त्यावेळीं त्यांना विरंगुळ्याची, प्रोत्साहनाची जरूरी होती;
व सुदेवानें ती अगदीं योग्य वेळीं मिळाली. ते नगरास रे, टिळकांच्या घरीं
रहावयास गेले. त्यांना तेथें लक्ष्मीबाई टिळकांसारखी प्रेमळ आई मिळाली.
राजकारणापासून अगदीं अलिप्त पण प्रेमळ अश्या मित्रांचा सहवास घडला.
अनेक कर्वींची ओळख झाली. या सर्व कारणांमुळें ऐतिह्यासैक व राजकीय कविता
लिहिण्याची वृत्ति कमी झाली. पण शेवटपर्यंत त्यांच्या ठिकाणीं राष्ट्रीय इन्ति
वास करीत होती. मरणापूर्वी ७-८ महिने ते एका मित्राजवळ म्हणाले, “ तरुणांनी
संघरना केली पाहिजे. राष्ट्राकरितां कांहीं तरी केलें पाहिजे. ” आपण मराठे
जिवंत रक्ताचे आहों, आपली परंपरा उज्ज्वल आहे. आपलें वर्तन आपल्या
पूर्वजांना साजेलसँ असलें पाहिजे, असे ते शेवटपर्यंत म्हणत. सांगण्याचें कारण
इतकेच कीं त्यांची राष्ट्रीय कविता अनुकरणात्मक नसून राजकीय चळवळीने
उद्भवली होती व त्यांच्या ऐतिहासिक कविता महाराष्ट्राच्या मराठेशाहीच्या
उज्वल इ्ातैहासावर लिहिल्या गेल्या असत्या. असो,
वनवासी
वर दिलेल्या गोष्टी इ. स, १९०५-१९०६ च्या सुमारास घटून आल्या.
त्याच सुमारास एरंडोल येथें एक हरदास आले. त्यांचें नांव रामचंद्र कृष्ण वेद्य,
हे इंदूरचे राहणारे; त्यांना एकाएकीं वैराग्य उत्पन्न झाल्यामुळें त्यांनीं संसाराचा
त्याग केला, वनवासी हें नांव घारण करून कथा करण्यास सुरवात केली; ते
पांवागड, सिंहगड वगैरे ऐतिहासिक विषयावर कथा करीत, अंगीं कवित्व भरपूर,
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...