मुक्तेश्वर सभापर्व | Mukteshvar Sabhaaparv

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mukteshvar Sabhaaparv by दु. का. संत - Du. Ka. Santस. रा. गाडगीळ - S. Ra. Gadgil

More Information About Authors :

दु. का. संत - Du. Ka. Sant

No Information available about दु. का. संत - Du. Ka. Sant

Add Infomation AboutDu. Ka. Sant

स. रा. गाडगीळ - S. Ra. Gadgil

No Information available about स. रा. गाडगीळ - S. Ra. Gadgil

Add Infomation About. . S. Ra. Gadgil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सभापर्व ७ काव्याला होतें हा महत्त्वाचा भेद ध्यानांत घेतला पाहिजे. आश्चयदात्या राजाला रंजविण्यासाठीं अगर त्याच्या स्तुति वा मनोविनोदनासाठीं संस्कृत कवींचीं काव्यें निर्माण झालों--निदान त्यांची भूमिका तरी तशी आहे. त्यामुळं त्यांत अलंकारांची, रसवत्तेची करामत असली तरी, त्यांत संकेत बोजडपणाच अधिक. उन्चत अशा जौवित मल्यांची त्यांना ओढ होती असे कूठे दिसत नाहीं. मराठी कवींचा सबंध जमानाच वेगळा. त्यांचे रसिक वेगळे, विषय वेगळं, निष्ठा वेगळ्या, सवच निराळे होते. ] ज्ञानेदवरापासून जो भक्तीचा महिमा सुरू झाला, त्याचा आधार व आश्रय या जुन्या मराठी कथाकाव्याला आहे व हें त्याचें महत्त्वाचें व्यवच्छेदक लक्षण आहे. राम व कृष्ण यांच्या जीवनांतील प्रसंग निवडण्याचें कारण त्यांच्या चरित्रांत भक्तोस भरप्र वाव आहे हेंच होय. त्याशिवाय तत्त्वज्ञान चर्चा, विशिष्ट नीतिधमं, कमॅनिष्ठ वतंणूक इ. गोष्टी मराठी कवींना तितक्याच महत्त्वाच्या वाटल्या व म्हणूनच त्यांनीं रामायणाची व विशेषतः महाभारताची निवड केली. कारण या सवं विविध अंगोपांगांना अवसर त्यांतच मिळणे शक्‍य होतें. काव्यदृष्ट्या हया कवींनीं संस्कृतचेच संकेत वापरले. अतिशयोक्तपूर्ण वर्णन, उत्प्रेक्षा प्राधान्य, थोडासा कालविपर्यास, इ. विशेष त्यांना स्वीकार्य वाटले. कथाकाव्यांतील रामायण महाभारताच महत्व नी वर उल्लेखिलेलीं परमेश्वर, भक्ति, नीति. . . इ. अध्यात्मिक म्ये, व त्यांच्या अनुषंगानें रस, अलंकारादि वाड्मयीन मल्य, या सर्वांचा यथोचित अविष्कार रासायण सहाभारतांत कवींना सांपडलें व यांतच रामायण भारताचें मोठेपण आहे. महापुरुषांचीं चरित्रें त्यांना आदश वाटलीं नाहींत याचें कारण या मल्यांबद्दलचा त्यांचा आग्रह हें होय. संस्कृत कवोंना अध्यात्मिक समतेची कल्पनाच नसल्यानें, त्यांचें लक्ष राजावर केंद्रित झालें असणे साहजिक आहे. पण मराठी कवींचें तसें नव्हतें. त्यांना कोणा राजेदवराची स्तुति करावयाची नव्हती. परमेश्वराची प्राप्ति हेंच त्यांचे अध्यात्मिक ध्येय होतें. एंहिक जीवनांत नीतिमत्ता, सत्यनिष्ठा इ. तत्त्वांचा पुरस्कार करावा व चारहि पुरुषार्थांचें सात्त्विकस्वरूप जनतेला दाखवन द्यावें याच उद्देशानें त्यांनीं आपलीं काव्ये लिहिलीं. या द्विविध ध्येयाला महाभारतांत चांगलाच अवसर 'मिळाला. निरनिराळ्या बावीस कवींनी भारतावर रचना केली, ती कां




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now