ग्यान बाचें अर्थशास्त्र | Gyaanabaachen Arthashaastr

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gyaanabaachen Arthashaastr  by नरहर विष्णु गाडगीळ - Narhar Vishnu Gadgil

More Information About Author :

No Information available about नरहर विष्णु गाडगीळ - Narhar Vishnu Gadgil

Add Infomation AboutNarhar Vishnu Gadgil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रास्ताविक के प्रेरित झालेले असतात. हे त्यांचे निर्णय त्यांच्या आभिरुचींवर अवलंबून नसून नफा मिळविणे हा त्यांचा हेठु असल्यामुळें ते सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर अव- लंबून असतात. तसेंच त्यांचे परिणामही आर्थिक ब सामाजिक असतात. त्यांचे नि्णेय वरील परिणामांसंब्रंधांत, कांहींचें कारण व कांहींच काय असे उभयविधस्वरूपी असतात. खासगी व्यक्तीचे निर्णय असोत अगर धंद्यातील व्यक्तीचे असोत त्यांचे अखेरचे परिणाम आर्थिक व्यवहारावर होतातच, समाजापु्दे उत्पादन--उपभोग्य वस्तूंचे उत्पादन हा सर्वात मोठा प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्तीला साहजिक जास्तींत जास्त वस्तूंची इच्छा असत व समाजांतील सवव व्यक्तींना त्या पुरविणे शक्‍य नसतें, एक तर सवानी त्यागी होऊन आपल्या गरजा अत्यल्प केल्या पाहिजेत, नाहीं तर सवं गोष्टी सष्टीने तयार करून कल्परक्षाप्रमा्णे दिल्या पाहिजेत; पण या गोष्टी शक्य नाहींत. श्श्रीमंतांना कांहीं कमी नाहीं, गरिबांना कांहीं मिळत नाहीं !? ही विषमता आज दिसते. असें कां? अवश्यक वस्त कां मिळूं नयेत १ सर्वाना संपूर्ण प्रमाणांत त्या कां मिळूं नयेत १ वस्तुस्थिति अशी आहे कीं हवा, उजेड, पाणी वगेरे ज्या गोष्टी सष्टीनें दिल्या आहेत त्या सोडून दिल्यास उपभोग्य बस्ठु उत्पादन कराव्या लागतात, त्या मानवी श्रमाने तयार कराव्या लागतात आणि या वस्तु तयार करावयाच्या म्हणजे कांहीं घटक---उत्पा- दनाचे घटक ( ॥80०६०75 ०1 ९५०१५९०४०7 ) अवश्यक आहेत; जमीन, श्रम, यंत्र- सामग्री वगेरे, जर हे घटक, ही सामग्री विपुल प्रमाणांत असेल तर उपभोग्य वस्तु- ही समाजांतील सवे लोकांना पुरतील इतक्या तयार करतां येतील; पण या घटकांना मयादा आहेत. मनुष्य जास्तीत जास्त किती श्रम करील यालाही मर्यादा आहे. पुनः लोकसंख्या वाढली तर लागलीच वस्तूंची मागणीही वाढणार, जमीन ही मयादित आहे, अन्य सव वस्तुही मर्यादित आहेत व त्यामुळें उपभोग्य वस्तूंचे उत्पादनही मर्यादितच राहणार, तथापि याही परिस्थितींत समाजाला या बाबतींत विचार करावा लागतोच, निय व्यावे लागतातच, किती जमीन पड ठेवावी, किती लागवडीस घ्यावी, तींत कोणतीं पिक काढावी, गांवठाण किती असावें, गायराने किती असावीं, कारखान्यांत काय तयार व्हावें, दारूगोळा कीं कापड, संहारक वस्तु कीं सुखसवर्धक वस्तु वगेरे गोष्टी ठरवाऱ्या लागतात व त्याही तुलनेने व सापेक्षतेने, समाज ज्या मानानें व ज्या पद्ध- तीने हे निर्णय घेईल त्यावरच समाजाचे सुख व स्थेय अवलंबून राहतील. जगांतील पुढारलेलीं व सुधारलेली राष्ट्र हे उत्पादनासंबरंधींचे निर्णय कसे घ्रेतात व घेत आलीं, उत्पादक घटकांची योजना व त्यांचें संघटन निरनिराळ्या देशांत क्स होत आहे व विद्यमान उत्पादक घटकांचा व सामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग कर-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now