अनुताई वाघ : कोसबादच्या | ANUTAI WAGH BIOGRAPHY

ANUTAI WAGH BIOGRAPHY  by पुस्तक समूह - Pustak Samuhमंगला गोखले - MANGALA GOKHALE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मंगला गोखले - MANGALA GOKHALE

No Information available about मंगला गोखले - MANGALA GOKHALE

Add Infomation AboutMANGALA GOKHALE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खायची. उडता पक्षी गलोलीने मारून, तेथल्या तेथे गवत गोळा करून पेटवून भाजून खायची. अंगावर कपडा नाही. पोटात अन्न नाही. अशांना अनुताई कोणत्या तोंडाने सांगणार, र 'बाबा रे, रानात गवताची मुळे, फळे शोधायला जाऊ नकोसं.” अशीच एकदा बरीच मुलं शाळेत आली नाहीत तेव्हा नंतर अनुताईनी त्यातल्या एकाला विचारले तर तो म्हणाला, झ 'काल आमचा उपास होता म्हणून शाळेत नाही आलो.” अनुताईंच्या लक्षात येईना कसला उपवास? मग पुन्हा विचारले कसला उपवास होता रे? दोन्ही हात उडवत मुलगा म्हणाला, काल आमच्या घरात अन्नच नव्हतं खायला.” १ पोटात कावळे ओरडत असताना, मुलांना घोकंपट्टी कशी सुचणार! पुस्तकी ज्ञानाने पोट भरत नाही. हे त्या अडाणी पोरांइतकंच सहृदय अनुताईनीही जांणले होते. मग त्यावर उपाय काय! तर, अंगणवाडी. मुलं शाळेत येत नाहीत ना! मग शाळेचं झाड मुलांच्या अंगणात ,_ लावायचं. आईवडील कामानिमित्त बाहेर. जरा मोठी मुलं, विटांच्या . मट्टीवर अगर कुठेतरी कामावर. मग ८-१० वर्षांच्या मुलांनी गाडगी, . मडकी, कुडाच्या भिंतीचं घर सांमाळायचं. लहान भावंडाना सांमाळायचं अशा मुलांसाठी मग, अनुताईंनी पहिली अंगणवाडी सुरू केली ती. 3 “हल्लपत निवास” , न या अंगणवाडीचीसुद्धा मजाच झाली. पहिल्या दिवशी मुलं यक्षकांना मिऊन पंळून गेली. घरात लपून, दाराआडून नुसती , किलकिल्या डोळ्यांनी बघत राहिली मग अनुताईंनी पण एकू. गंमत २६ / कोसब्राडच्या अनुताई वाघ. केली. दुसऱ्या दिवशी अनुताईंनी वाटीमध्ये मणी व दोरा आणला आणि त्या वाट्या-दाराशी ठेवून दिल्या. हळूच बाजूला जाऊन, सगळ्या शिक्षिका बघू लागल्या तर थोड्यावेळाने सगळ्या वाट्या आत गेल्या आणि माळांसह बाहेर आल्या. हळूहळू मुलांशी ओळख होऊ लागली. मुलं शिक्षकांची वाट पाहू लागली. मग तिथे जाऊन अंगण झाडायचं. भोवतालच्या झोपड्यांच्या भिंती चित्रित करायच्या, झाडांचे बुंधे रंगवायचे. चित्रकलावर्ग सुरू झाला. गावातल्या बालवाडीत,. दूरवरून येऊ न शकणाऱ्या मुलांच्या अंगणात अंगणवाडी झाली. मुलं त्यात रमू लागली. , त तरी हज जगण्यासाठी चाललेली धडपड, अडचणी कमी होईनात. काही मुलांचाच प्रश्न सुटला. मग शाळा कशी फुलणार? शाळेचं झाड कसं बहरणार ? सतत विचारमंथन सुरूच. या मुलांसाठी त्यांच्या गरजा पुरविणारी, शाळा हवी. तुमच्या-आमच्या सारखी शहरी शाळा १२ ते ६ इथे काय उपयोगाची ? कामातून एवढा वेळ आहेच कुठे या आदिवासी मुलांकडे? पुस्तकं-वह्या-पेन्सिली आणायच्या तरी कशा आणि कुठून? रोजचे पोटभर जेवायला न मिळणाऱ्या, या मुलांना आपल्या शहरीशाळांची चैन परवडणारी नाहीच. आईबाप सकाळीच कामावर निघून गेल्यावर, लहान भावंडं सांमाळायचं कामही या मुलांना करावं लागत. मग मी .लहान्यांना कुठे ठेवणार ? शाळेत कशी येणार? 5 शिक्षणाचा हा बिकट प्रश्‍न सोडविण्यासाठी, ताराबाईंनी या भागात मोठ्या प्रमाणावर विकासवाडी सुरू करायचं ठरवलं. तेव्हा संस्थेचे व्यवस्थापक म्हणून भावनगरहून श्री राममाई पाठक यांना ताराबाईंनी बोलावून घेतले. अनुताईवरही जबाबंदारी टाकली. आता रामभाईबरोबर काम करायचं म्हणजे आला कां नाही. कोसबाडच्या अनुताई वाघ / २७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now