आजीचा न्याय | AAJEECHA NYAY

AAJEECHA NYAY  by पुस्तक समूह - Pustak Samuhरिझवान ज़हीर उस्मान - RIZWAN ZAHEER USMANविनय आर० आर० - VINAY R. R.

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

रिझवान ज़हीर उस्मान - RIZWAN ZAHEER USMAN

No Information available about रिझवान ज़हीर उस्मान - RIZWAN ZAHEER USMAN

Add Infomation AboutRIZWAN ZAHEER USMAN

विनय आर० आर० - VINAY R. R.

No Information available about विनय आर० आर० - VINAY R. R.

Add Infomation AboutVINAY R. R.

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सर्वांनी मिळून खायच्या. दुसरा म्हणाला, “पण असं केलं तर मग सर्वच भाकऱ्या संपून जातील.*'* तिसरा म्हणाला, “जगलो तर आणखी भाकरी कमादू.*' पहिला म्हणाला, “दुसरी काही युक्ती सुचत असेल तर बोला. विचार करू.*'* तिसरा म्हणाला, “मला हा मार्ग योग्य वाटतो. मी आठही नाणी तुम्हाला देतो. आपण सर्व भाकऱ्या वाढून खाऊया. याप्रमाणे विचार करून तिघांचा निर्णय झाला. तिसर्‍्याने आठही नाणी त्या दोघांसमोर ठेवली. पाच भाकरीवाल्याने पाच भाकरी काढल्या, तीन भाकरीवाल्याने तीन भाकरी काढल्या. प्रत्येक भाकरीचे त्यांनी तीन तीन तुकडे केले. एकूण तुकडे झाले चोवीस. प्रत्येकानं आठ आठ तुकडे खाल्ले. पाणी पिऊन ढेकर दिली. आता प्रत्येकाचे पोट भरले होते. तरतरी वाटत होती. दोघांचे मनापासून आभार मानून तो तिसरा निघून गेला. त्याला वेगळ्या ८./आजीचा न्याय दिशेने जायचे होते. तो गेला तसे हे दोघेही निघाले. आता पावले झपाझपा पडत होती. शहर जवळ आल्यासारखं वाटायला लागलं, तसं तीन भाकरीवाला म्हणाला, (“आता आठ नाण्यांची वाटणी करू या. पाच भाकरीवाला म्हणाला, “चालेल.” त्याने तीन भाकरीवाल्याला तीन नाणी दिली. तीन भाकरीवाला संतापला, म्हणाला, “तीन नाणी कशी? आठ रूपयांना भाकरी विकल्या. सर्वांनी वाढून खाल्ल्या. आता रूपयांची वाटणी तशीच होऊ दे. चार नाणी मला दे. चार नाणी तू घे.” पाच भाकरीवाला म्हणाला, “माझ्या पाच भाकरी होत्या म्हणून मला पाच नाणी आणि तुझ्या तीन भाकरी होत्या म्हणून तुला तीन नाणी.** तीन भाकरीवाल्याला हे मान्य नव्हतं. त्याला अर्धा हिस्सा हवा होता. पण पाच भाकरीवाला अर्धे अर्धे वाटे करणार नाही म्हणून अडून राहिला. दोघे शहराजवळ आले तरी भांडतच होते. शहराच्या वेशीपाशी एका म्हाताऱ्या आजीचं घर होते. ती चतुर होती. गावातले झगडे तिच्याकडे आले की ती योग्य निवाडा करत असे. आजीनं दोघांना भांडताना पाहिलं. तिनं त्यांना विचारलं, आजीचा न्याय/<




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now