मराठी वाद्मयाचा इतिहास १ | Maraathii Vaadmayaachaa Itihaas 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathii Vaadmayaachaa Itihaas 1 by लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

Add Infomation AboutLakshman Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(५) याज्ञवल्क्य यांनीं विशेषतः कशी करून दिली आहे हे उपनिषद्टचनाधारे दाखविलें आहे व सवैप्रिय आणि सुलभ असें जें कठोपनिषद्‌ त्यांचा थोडा विस्तार केला आहे. उपनिषद व गीता आणि गाता व भागवत यांचें ऐकरातम्य दाखवीत गीताभागवतांच स्वरूपदर्शन केलें अहे. गीतेनें स्वधमेकमींचा उपदेश केला असला तरी मोहनिरास हा गीताशास्त्राचा हेतु व ज्ञानोत्तरभक्ति ह गीतेचें रहस्य आहे असें गीताप्रकरणांत स्पष्ट केले आहे. अवाचीनांची भागवताविषयींची समजूत कशीही असली तरी प्राकृत वाड्मयाला भागवताचा मुख्य आधार असल्यामुळें भागवतावरील चौथे प्रकरण जरा विस्तृत लिहिलें आहे त्यांत भागवतांतील मुख्यमुद्य विषय स्क्रंथवार सांगित& असून भागवताची बेठक वेदोपनिषदांप्रमाणेंच अद्वेतज्ञानाची आहे, तरी भक्तिस्वरूप, उत्तम भक्त, गुणानुवाद व नामसंकीतेंन, संत व सत्संग याविषयींच भागवताचे अम्त- मधुर विचार-जे पुढील भक्तिमागोच्या वाढीस कारण झाले-ते दिले आहेत. अखेर “ गोपींच्या भक्तिप्रेमाची १ मीमांसा करून भागवतप्रकरण संपाविलें आहे. पांचब्या प्रकरणांत भक्तिमार्गांचे अनादित्व व शिवविष्णूंची एकरूपता यांचें विवेचन केलें आहे. हीं पांच प्रकरणे म्हणजे आपल्या धमांच्या वाड्मयाचा संक्षिप्त इतिहासच आहे म्हटलें तरी चालेल. सहावे प्रकरण संपूण ऐतिहासिक आहे. त्यांत वेदविरोधी बौद्ध व जन पंथ भरतखंडांत निघाले: अशोकामुळें बौद्धपंथ फेलावला; पुष्पमित्र, विक्रमादित्य, चंद्रगुप्त व समुद्रगुप्त, हषेवघेन, ललितादित्य, भोज इ० सम्राटांच्या राजवटींत हे दोन्ही पथ मागें पडून वेदिकघमानें आपलें साम्राज्य पुन्हा स्थापिले; परधमीय व परदेदी1य लोकांच्या टोळधाडी भरतखंडावर कासळल्या असतांही हिंदुराजांनीं त्यांचा प्रतीकार केला तथापि अखेर यवनांचे पाय येथें रोंबून भरतखंडाचा नकाशा बदलला हा सुमारें दीडहजार वर्षांचा इतिहास ह्या प्रकरणांत दिला आहे. बौद्ध व जेन पंथांशीं दक्षिणच्या द्रविड राजांनी, विशेषतः तामीळ राजांनीं व तार्माळ संत आणि आचाये यांनीं, निकराने झगडून वेदिकधमांच्या पुनरुजीवनास कसें साह्य केलें हॅ सातव्या प्रकरणांत सांगितलें आहे. तामीळांचें साम्राज्य व त्यांचीं अजखर शिल्पकामें हीं कोतुकावह आहेतच, पण तामीळ संतांनीं व तामीळ आचायीनीं जी धमाची व संस्कृतप्राकृत वाड्मयाची कामगिरी केली आहे ती साऱ्या भरतभूमीला भूषणभूत झालेली आहे. सवे प्राकृतभाषांपेक्षां तामीळ भाषा प्राचीनतर आहे व तिच्यांतलें वाड्मय साऱ्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now