परागंदा | Paraagandaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paraagandaa by श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पैसे कंपनीक्रडून पुन्हां परत मिळणार हें ठरल्या- सारखेच होतें त्या अथी त्यांनां कातडीं विकत घेण्यास दुसऱ्याकडून पैलेहि मिळत; हें जेव्हां त्यास दिसून आले तेव्हां तसल्या गोष्टी आपणहि कां करू नयेत असें त्यांस बादूं लागलें. आणि त्यानीं आपली ही इच्छा आपल्या वरिष्ठास कळविली. तेव्हां वरिष्ठ त्यांनां म्हणाला कीं तू स्वतःच्या पैशाने जर कातडीं विकत घेऊन आम्हाला विकीत जाशील तर्‌ आम्ही तुझ्यापासूनहि ती विकत घेऊं. तू दोन पैते मिळवावे याच्बी विरुद्ध आम्ही मुळीच नाहीं. अरे, व्यापारांत मनुष्य पडणार तो पैसे मिळव- ण्यासाठींच ना पडणार आणि आज जे मनुष्य व्यापारी नोकर आहे, तो उद्यां मुख्य व्यापारीच व्हायचा. शिवाय जो स्वतः व्यापार करून दोन पैसे मिळवितो तोच कंपनीचा आधिक मोलाचा नोकर होतो. त. माल स्वतः करतां खरेदी करूं लागशीळ तरच तुला मालाची पारख बरोबर करतां येईल, आणि तो कोणत्या भावाने खरेदी करावा हें तुला समजेल, पण हेंहिं लक्षांत ठेव कीं तू आमच्या- कडचा मनुष्य म्हणून तुझा माल आम्ही पसत करणार नाहीं. याप्रमाणें वरिष्ठाकडून उत्तेजन मिळतांच कांट्ही माल स्वतःच्या जबाबदारीवर खरेदी करून तो पुढं आपल्या किंवा दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीला विकण्याला गोविंदरावाने सुरवात केळी. ती करतां करतां माल मुंबई बाजारांत येण्यापूर्वी कितीकांच्या हातांतून जाते; वगैरे गोष्टी त्यास दिसून येऊन तो माळ जास्त किफायतीनें कसा खरेदी करीत जावा इल्यादे गोष्टींमध्ये त्याचे डोके चाळू लागले; आणि याप्रमाणें त्याला व्यापाराची सवे प्रकारची माहिती जेव्हां आधि- काचिक होऊं लागली तेव्हां त्याची त्या कप- नीच्या आफीसामध्ध्ये देखील किंमत बाढू लागली आणि पुढ, एक जबाबदार पण तरुण कारकून अशा तऱ्हेने त्याचे वरिष्ठ त्याच्याकडे पाहूं लागले. पुष्कळ दिवस त्याचा पगार ६० रुपयांच्या हिदी अमोरेकन कुंटुंब खाळींच 'होता, पग त्याची माल व्िकत घेऊन कपनी पुरविण्याच्या क्रियेतील प्रात्ति बरीच मोठी होती. तथापि त्या वेळेस दोघांनींहि फान्सा खचे करावयाचा नाहीं, काटकसरीनेंच रहावयाचे आणि ज्या दिवशीं मोठ्या चांगल्या बगल्यांत रहाण्याची ऐपत येईल त्यादिवशीं घर बदळाव- याचें; तोपर्यंत चाळींतच रहावयाचे, इत्यादि गोष्टी त्यांनी योजल्या होत्या. पण स्यांनां मोठ्या बगल्यांत रहावयाचे दिवसच आले नाहींत. मध्येंच त्या कुटुंबाने अमेरिकेस प्रयाण केलें. १९२० हजार रुपये जमले; पण ते खचासाठी लावण्याची सोय नव्हती. ते सव व्यापाराला हे ह्येते, आणि त्यामुळें ' आपल्या श्रीमेतीने आपल्या बहिणींचा नक्षा उत- रविण्याची शांताबाईची इच्छा पुरी झाली नाहीं. कांहीं दिवसांनीं पीटर हार्वे हा परत जावयंका निघाला तेव्हां त्याने गोविंदरावाला माझ्याबरेएवरे अमेरिकेस येतास का! म्हणून विचारलं. गोर्विद- रावांनीहि कांहीं पुंजी जमविली होती, व असमे- रिकेस आपण गेरी तर तेथेहि आपण चांगळा व्यापार करूं, व्यापाराची तिकडची बाजूहि आप- णांस समजेल असें मनांत धरून गोविंदरावांनीं तिकडे जावयाचे ठरविलें आणि शांताबाईचीहि त्या विचाराला पूणे संमति मिळाली. हीं संमति देण्यांत त्यांचे त्यांत अनेक हेतू होते. शांताबा- इंच्या बऱ्याचशा श्रीमंत आत्तांत कांहीं लोक इंग्लंडला वगेरे गेले होते, वज जाऊन आले ते अशा तोऱ्याने वागत कीं, हिदुस्थानांतले लोक म्हणजे काब अगदीं जगली; तेव्हां शांतेला असें वाटे कीं, विलायतेअमेरिकेला आपणहि जावें आणि परत आल्या नंतर आपल्या दोघी बहिणींनां त्यांच्या जगळीपणाबद्दल खिजवायला सांपडावें. . प्रस्तुत बापलेकांच्या संभाषणाचा काल म्हटला म्हणज १९९० साल हय. या सालीं गोविंदराव कामत यांस पंचावन्नावे वषे पुरं झालें'होतें. ते आपल्या वयाच्या ३०व्या वर्षी म्हणने १८९५च्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now