काळांतीळ निवडक निबंध भाग ४ | Kaalaantiil Nivadak Nibandh Bhaag 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaalaantiil Nivadak Nibandh Bhaag 4 by शं. द. जावडेकर - Shan. D. Javadekarशिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Authors :

शं. द. जावडेकर - Shan. D. Javadekar

No Information available about शं. द. जावडेकर - Shan. D. Javadekar

Add Infomation AboutShan. D. Javadekar

शिवराम महादेव - Shivram Mahadev

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) चौथ्या भागांतील विषय “काळ? पत्राचें चौर्थे वर्षे म्हणजे १९०१ मधील वर्षप्रतिपदेपासून १९०२ च्या फाल्गुन अखेरप्येतचे वर्ष होय, हा काळ म्हणजे महाराष्ट्रांतील राष्ट्रीय पक्षाच्या नेरा्याचाच काळ होय. प्लेग आणि दुष्काळ या दोन आपत्तींनी होरपळून निघालेलीं जनता न्रिटिझ सरकारच्या जुलमानें हवालदिल झालेली होती. लोकमान्य टिळक आपला खडतर कारावास भोगून नुकतेच बाहेर आलेले होते. आणि नामदार गोखले हिंदुस्थान सरकारच्या कायदेमंडळांत लॉड कर्झन यांच्या करड्या अमलावर सनदशीर टीका करण्याची पूर्वतयारी करीत होते. ब्रिटि्षांच्या जुलमाचा प्रतिकार केला असतां केवढे उग्र शासन प्रातिकार करणाऱ्यांना मिळूं शकते याचें प्रत्यक्ष दशन चाफेकर प्रकरणाने पुण्यां- तील जनतेच्या निद्शनास आले होतें. ब्रिटिश सत्तेपुढे मान लववून न चाल- णारें राजकारण मुळासकट उपटून टाकण्यास ब्रिटिश सत्ता समर्थ आहे याचा अनुभव टिळकांना तुठुंगांत टाकून सरकारने जनतेला दिलेला होता. स्व आशिया खंड पादाक्रान्त करण्याची महेत्त्वाकांक्षा धरून लॉड कझन तिबेट, इराण, अफगाणिस्तान इकडे आपलीं राजकारणे रचीत होते. आशिया खंडांत युरोपच्या तोडीची कोणतीही सत्ता उदय पावूं शकेल अशी कोणास आशाही वाटत नव्हती. दक्षिण आफ्रिकेतील बोअर लोकांनीं केलेल ब्रिटिश साम्राज्या- विरुद्ध बंड ब्रिटिशांनी तात्पुरते तरी दडपून टाकले होत. आक्ियाप्रमाणे युरोपांत हि ब्रिटिशांना कोणी समान प्रतिस्पर्धी नव्हता. आपली वेभवशाली कारकीर्द संपवून व्हिक्टोरिया राणी नुकतीच ख्िस्तवासी झालेली होती. ऐहिक बेमव आणि अनियंत्रित सत्ता यांच्या शिखरावर विराजमान झालेल्या ब्रिटि- शांना स्वगस्थ देवांची उपमा देऊन त्यांच्या प्रसादाने मिळतील तेवढे हक्क प्रात करून घेण्यांत समाधान मानणें हच व्यवहाये राजकारण असें मानिले जात होते. ब्रिटिशांनी आपले साम्राज्य कमाविताना कोणकोणती कपट-कारस्थाने कलीं त्यांची चर्चा न करतां त्यांना ज्या अथी एवढे मोठें सामान्य वेभव प्राप्त झालें आहे त्या अर्थी त्यांची पुण्याच थोर असली पाहिजे हा सिद्धान्त ऐतिहासिक सत्य म्हणून प्रातिपादिला जात असे, पूर्ण चिकित्सक बुद्धीने ब्रिटिशांच्या राजनीतीची विचक्षणा करणाऱ्यांना जक्षी राजदंडाची भीति होती, तशीच व्यवहारदक्ष मुत्सद्दी म्हणीवणाऱ्यांकडून अविवेकी गणिले जाण्याची भीति होती. याच




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now