काळांतीळ निवडक निबंध भाग - ८ | Kaalaantiil Nivadak Nibandh Bhaag 8

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaalaantiil Nivadak Nibandh Bhaag 8 by ज. स. करंदीकर - J. S. Karandeekarशिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Authors :

ज. स. करंदीकर - J. S. Karandeekar

No Information available about ज. स. करंदीकर - J. S. Karandeekar

Add Infomation AboutJ. S. Karandeekar

शिवराम महादेव - Shivram Mahadev

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
व्याजीक्ति किती कुशलतेने नटविली आहे याची कल्पना येण्याकरितां मूळ लेखच वाचला पाहिजे, त्यावर कितीहि भाष्य केलें तरी त्या भाप्यांत मूळ हेखांतर! मममेदकपणा एकहाताशानैहि उतरणार नाहीं. “ स्वदेशभत्तीची व्याल्या' हा तिसरा लेख आहे. विलायतेत दादा- भाई नौरोजी प्रभ्ृति हिंदी पुढारी आणि वेडखने, हंडमन प्रभति हिंदप्रेमी इंग्लिश पुढारी यांच्यांत हिंदुस्थानासंबंधीं जी चची होत असे त्या चर्चेत एके वेळीं दादाभाई म्हणाले कीं, शक्त) 7012405 01बधि1£ 80 ९०0० 0ि्शंट्ट? 1016 * ( परकीय राजसत्तेची परिसमाति करणे म्हणजे स्वदेशभारक्ते होय). दादाभाईच्या तोंडचें हं वाक्य प्रसिद्ध झाल्याने शिवराम- पंत[ना साहजिकपरणेच एक मोठेच घबाड लाथल्याप्रमाणे वाटले आणि मग त्यांनीं ते दादाभाई चें वाक्य पिंजून पिंजून त्यांतून असा निष्कर्ष काढला कीं, ज्या अथी प्रत्येक माणसाने देशभक्त असाव अशी आपण अपेक्षा करती त्या अर्थी हिंदुस्थानांतील प्रत्येक माणसाने या देशातून इंग्लिझ्षांची सत्ता नाहीशी व्हावी असाच प्रयत्न केला पाहिज, पण असा उत्तानार्थ मवाळ लोकांना मानवणार नाही, आणि इतरानाहि तो राजंद्रोहात्मक वाटेल; याकरितां दादाभाईच्या वाक्याचा जो उत्तानाथ आहे तो तसाच न धेतां त्याचा लाक्षणिक अर्थच आपण घेतला पाहिजे, असं म्हणून शिवरामपंतांनीं मूळ वाक्यांतील उघड अथला मुरड घातली आहे आणि अखेरीस “ सिमल्यास ज्या खोलीमध्ये (राज्यकारभाराचा ) विचार करण्याकरितां दहा इंग्लिश लोक ( व्हाइसरॉय व त्याचे गोरे सल्लागार ) बसतात, त्या खोलीत दहाच्या दहा इंग्लिश लोक न ब्सतां सहा नेटिव हक आणि चार इंग्लिश लोक बसले, म्हणजे झाली परकीय सत्तेची पारसिमाति '* असला निष्कर्ष काढला आहे ! विछायतेत दादाभाईनी जे छातिठोक विधान केले तें विधान जसंच्या तसें ह्विंदुस्थानांत मांडण्याचीहि त्या वेळीं चोरी होती आणि शिवरा[मपंतांच्या लेखातील स्वातंत्र्याची कल्पनाहि या वेळेपर्यंत ४ इंग्लिश कोन्सिलर आणि सहा ईिंदी कौन्सिलर अशा काळ्यागोऱ्यांच्या संमिश्र कार्यकारी मंडळापलीकडे जाऊ शकली नव्हती. अर्थातच सद्या- स्थितींत था लेखाला एतिहासिक कथाभागाहून अधिक महत्त्व राहिले नाही,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now