आनंद मठ | Aanand Math

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
9 MB
                  Total Pages : 
154
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :

बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय - Bamkim Chandra Chattopadhyay
No Information available about बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय - Bamkim Chandra Chattopadhyay

भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar
No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)रू सस ननल्न्न्न्य््ळ्य्य्यभी मद मड
१७६९ सालीं पाऊस बरा पडला, लोकांना वाटलें, देवाने कृपा केळी. सारे
आनंदांत होते. आश्विन महिन्यांत अचानक देवाची अवकृपा झाली. पाऊस
थांबला. शेतातले घान्य बाळूंन त्याचें गवत झालें. लोकांना उपास पडूं लागले
महसूल मंत्री होता महमद रैझाखान' त्याला वाटलें, आपली प्रतिष्टा राखायची
बेळ हीच, त्यानें शॅकडा १० टक्के खड वाढवळा. बंगाल्यांत जिकडे तिकडे
हलकलछोळ माजला.
लोकांना उपास पडत होते. पुढें रोगाने गांठलें, होतें नव्हते तें सारे
विकून झाल्यावर मग ते मुलगे विकूं लागले. त्यानंतर बायकाची विक्री सुरू
झाली. सारेच विक्रीसाठी तळमळत द्दोते पण गिऱ्हाईक नव्हतें.
अन्न मिळत नाहीं म्हणून झाडाचा पाला खायची सुरवात झाली. कुणी
गवत खाऊ लागले. कुणी लव्हाळे खाऊं लागले. क्षुद्र आणि जगली लोक
डदीर, मांञजरें आणि कुत्रे खाऊं लागले.
रोगाला द्दीच संधी मिळाली. ताप, पटकी, क्षय, आणि देवीच्या सांथी सुरू
झाल्या. कोण कुणाला औषधोपचार करीत नव्हता कीं ढुंकून पहातही नव्हता.
मेल्यावर मुडदा जाळायलाह्री कुणी नव्हता. बड्या बड्या घरात मेलेले मुडदे
कुजून सडून जात होते.
महेन्द्रथिंह पदचिन्ह गांबांतला मोठा श्रीमत माणूस, पण आज गरीब
आणि श्रीमंत माणसाचा दर एकच झाला होता. त्या भल्या मोठ्या घरांत तो,
त्याची बायको आणि एक छोटी मुलगी एवढीच माणसें होतीं. त्याची बायको
कल्याणी काळजीचा बोजा दूर झुगारून गोठ्यांत जाऊन स्वतः दूध पिळून
आणीत होती. दूघ तापवून मुलीला पाजायचें आणि गाईला गवत पाणी
द्यायचे, हा नित्यक्रम आटोपून ती आली तेव्हा महेग्द्र म्हणाला, “ असं आतां
किती दिवस चालवणार १”
कल्याणी म्हणाली, “ जितके दिवस चालेल तितके दिवस चालवायचा
मी प्रयत्न करतें आहें. त्यानंतर मुलीला घेऊन दुम्ही शहरांत जा. ”
महेन्द्र म्हणाला, *“* शहरात जर जायचं होतं तर इतके दिवस तुला कां हे
कष्ट करू दिले अछते १ आतां याचवेळी सर्वांनीच का जाऊं नये १”
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...