पेशवाई तीळ पश्चिम दिग्विजय | Peshavaaniitiiila Pashvimadigvijaya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Peshavaaniitiiila Pashvimadigvijaya by विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

Add Infomation AboutViththal Vaman Hadap

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विषयप्रवेश १ होती. खाशांचा दरबार, त्याचा थाट अपूर्व असावयाचाच. पण त्यांत विशेष उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे बेठकींच्या मांडणीची होय. आजच्या बेठकींत कोणीं कुटें बसावें हें मानाजी व रामाजी महादेव यांनीं ठरविलें होतें, व मंडळीला बस- विण्याच्या कामागिरीवर तर एकट्या रामार्जीपंताची योजना करण्यांत आली होती. बैठकीत सर्व गाद्याच होत्या; फक्त एकच कोच बैठकीच्या मध्यभागीं मागच्या बाजूला मांडण्यांत आलें होतें. पुरुषांप्रमाणेंच आण््यांच्या घराण्यांतील खाशा स्त्रियांनाही दरबार पहाणे सुलभ जावें म्हणून दरबारमद्दालावरील मार्डाच्या सजांत चिकाचे पडदे लावून व्यवस्था करण्यांत आली होती. द्रबाराची वेळ सुयोंदयाची ठरल्यामुळें उजाडतें न उजाडतें तोंच प्रेक्षकांची गर्दी जमूं लागली. सरदार, मानकरी वगैरे थोर थोर निमंत्रित लोक सूर्योदयापूर्वी अर्धी घटका तेथें दाखल होऊ लागले. त्यांना त्यांच्या त्यांच्या जागीं गाद्यांवर रामाजीपंतानें बसविलें. अगदीं मध्यभागच्या तीन गाद्या सोडून चौथ्या गादीवर प्रति- निधि बसले; त्यांच्यापलीकडे फत्तेसिंग भोसले बसले. सूर्योदयाचा समय होण्या- पूर्वी थोडा वेळ कॅप्टन इंचबर्ड, कॅप्टन हाल्डेन व कॉडेंडि संडो मिल असे तिचघे- जण आले, त्यांना रामाजीपंतानें मुद्दाम त्यांच्यासाठी जरा बाजूला मांडण्यात आलेल्या कोचावर बसविले. दव्यांच्या मागोमाग येसाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, थॉंडजी आंग्रे आणि महिपानजी व रघूजी हे मानाजी आंग्यांचे दोघे वडील मुलगे अशी मंडळी आली. त्यांना खाशांच्या गादीच्या उजव्या बाजूला फक्त मधल्या तीन गाद्या सोडून बसविण्यांत॑ आले. इतक्यांत संभाजी आपल्या भाल- दार-चोपदारांसह ललकारणीवा सन्मान घेत आला. त्याला मध्यभागच्या गादीच्या डाव्या बाजूला स्थान मिळालें. आतां फक्त मानाजी आंग्रे व बाजीराव हे दोघेच काय ते यावयाचे राहिले. निमंत्रित पाहुण्यांनी व प्रेक्षकांनीं दरब्रार गजबजून गेला, व सूर्योदय झाला. तशी दरबाराविषयींची सवाची उत्कंठाही वाहू लागली. इतक्यांत चोपदारानें मानाजी आंग्य्याच्या नांवाचा ललकारा केला. त्या लल- काऱ्यांत मानाजी आंग्रे 'वजारतमाब* झाले असल्याचा उल्लेख होता. त्या ललकाऱ्या- मागोमाग मानाजी दरबारांत प्रविष्ट झाला. सर्वांना मोठा अचंबा वाटला. संभाजी आंग्रे सरखेल त्या दरबारांत हजर होताच, त्यालाह्दी तो ललकारा ऐकून जरा चम- त्कारिक वाटलें. त्याची चर्या गंभीर झाली. दरबारांतील सर्व लोकांचे डोळे मानाजी- कढे वेधून राहेले, मानाजी एखाद्या विजयी वीराप्रमाणें प्रसन्न वदनानें नोकर भक च चळ वक. च प आ पि तितीच कट निनीिाटी आत तज आ आ आ ची अपन निट ओली पन्टानशा ता पि जा आळ ती




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now