पालकनीती - अप्रैल -2014 | PALAKNEETI - APRIL 2014

PALAKNEETI - APRIL 2014 by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पालकनीती ७ एप्रिल २०१४ गरिबांना मोजावी लागणार आहे. अजूनही आपली अर्थव्यवस्था पर्यावरण नष्ट करण्याच्या उद्योगालाच बक्षीस देते आणि पर्यावरणाचं संवर्धन कुणाला परवडत नाही! श्रीनं त्याच्या स्वतःच्याच कॉलेजात, ।(£१0 मध्ये, शिकवायला सुरुवात केली. तरुण मुलांच्या शिकण्याच्या क्षमता, त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल वाटणाऱ्या चिता, व्यावहारिक जगाशी कसं वागावं याबद्दलची भीती ह्या सगळ्यासकट त्यानं तरुणाई जाणून घेतली. त्याचा विषय आणि शिकवण्याचं कौशल्य त्यानं आत्मसात केलं. तो उत्तम शिक्षक झाला, तो सातत्यानं शिकतही राहिला. (८१८ मधे ॥॥.1600 करणाऱ्या केमिकल इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांना थर्मोडायनामिक्स शिकवताना शाश्‍वततेशी असलेला त्याचा संबंध श्री मुलांपर्यंत पोचवत राहतो. प्रत्येक तासाला पाचतरी मिनिटं या विषयावर चर्चा होतेच. शिवाय त्याचं बोलणं आणि त्यानुसार साधं जगणं मुलांना डोळ्यापुढे सतत दिसतं. त्यामुळेही त्याचं बोलणं अधिक परिणामकारकारक होत असावं. आजही त्याचा सट्ठा घेण्यासाठी अनेक व्यावसायिक त्याला शेतावर फोन करतात. विद्यार्थी तर करतातच. त्याच्या बरोबर त्याच्या शेतावर राहण्यासाठी त्याचे विद्यार्थी चार-दोन दिवस, तर काही महिना-महिना येतात. मुलांनी केलेलं काम, प्रकल्पाचे अहवाल, अगदी नेहमीच्या परीक्षांचे पेपर तपासतानाही, विद्यार्थ्यांना सुधारण्यास मदत व्हावी म्हणून तो अत्यंत विस्तारानं त्यावर टीपा लिहितो. रात्ररत्र त्यात घालवतो. मग विद्यार्थ्यांचा तो अत्यंत आवडता शिक्षक आहे, यात काही नवल नाही. त्याची ही संवेदनशील दृष्टी विद्यार्थांपर्यंत पोचतेच. 'सांगत्य'मध्ये येणाऱयांचं स्वागत अगदी सहज होतं. पाहुणा आरामात आहे ना इकडे श्रीचं लक्ष असतं. तो शांतपणे तुम्हाला शेती- जमीन दाखवेल, सध्या काय चालू आहे ते दाखवेल, तिथल्या अडचणी - प्रशश्‍न-चिंता याबद्दल सांगेल. तुम्ही तिथे रुळलात आणि तुमची इच्छा आहे असं दिसलं तर एखादं कामही सांगेल. तो स्वतः उत्कृष्ट स्वयंपाक करतो. उरकून टाकणं हा त्याचा स्वभावच नाही. अगदी वाटण-घाटण करून खास पदार्थसुद्धा निगुतीनं सुंदर बनवतो. त्यात कधी घरचा नारळ असतो, तर कधी शेतावरच्या भाज्या-तांदूळ असतात. तो काही शेतकरी कुटुंबातून आलेला नाही. वाचन आणि दृष्टिकोन यातूनच त्याचा शेतीतला रस तयार झालाय. श्री संपूर्ण क्रांती विद्यालयात गेला, तिथं थोडी शेती होत असे. तेव्हा तो चाळिशीत होता, आणि प्रत्यक्ष जमीन घेईपर्यंत आणखी सात वर्ष मध्ये गेली. शेतीचा अनुभव त्यानं स्वत:च शेती करताकरता मिळवलाय. संवेदनशील मन, नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा आणि क्षमता, शेजारपाजार्‍्यांशी लगेच जुळणारं नातं, त्यांना आपलेपणानं केलेली मदत या सगळ्यातून श्रीचं शेती करणं आणि जगणं वाहातं आहे. सजीवांना लागणारं अन्न केवळ वनस्पतीच तयार करू शकतात. केवळ अन्नच नव्हे तर इतर गरजा भागवण्यासाठी लागणारा कच्चा मालही केवळ वनस्पतीच निर्माण करू शकतात. तरीसुद्धा आपण त्यांचं महत्त्व जाणलेलं नाही. त्या टिकून राहतील इकडे पुरेसं लक्ष दिलेलं नाही. मी सांगत्यमध्ये अगदी काहीच म्हणजे, साताठ दिवसच राहिले होते. त्यात माझ्या मनात भरून राहिलेली गोष्ट होती ती, श्रीकुमार नावाच्या माणसाचं अत्यंत डोळस तरीही साधं-सरळ असणं आणि तसंच वागणं. त्या काळात त्यांना कॉलेजच्या मुलांचे बरेच पेपर तपासायचे होते. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधून ते तपासण्याची त्यांची पद्धत असल्यानं त्यांना एरवी कॉलेजच्या प्रोफेसरांना लागतो त्याच्याहून खूपच जास्त वेळ लागायचा, त्यामुळे दिवसरात्र काम सुरू होतं. आम्हीही ते जरा इकडे तिकडे रमलेले दिसले, की दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना घरातले दटावत असतात तसे कामाकडे ढकलत होतो. अर्थात दिवसभर शेतात काम होतंच. चारपाच विद्यार्थी काम करायला, सरांच्या सोबत राहायला आलेले होते. हा माणूस अक्षरशः प्रचंड कष्टाळू आहे, पण नुसताच कष्टाळू नाही, त्याचं जगण्यावर, मातीवर, आसपासच्या कुणाही माणसावर कमालीचं प्रेम आहे. सहदेवनची दोन मुलं त्यावेळी आलेली होती. ती तर लाडकी भाचरंच. त्यांचे लाड होते. विद्यार्थ्यांकडे सजग लक्ष होतंच. त्यांना मोकळीक होतीच, पण स्वतःसोबत घेऊन घामटं निघेपर्यंत काम होतं. शेजाऱ्यांशी तर ते इतकं समजूतदार वागत की 'अशा माणसाला काय कुणीही फसवणारच' असले सोपे निष्कर्ष काढून आमच्यासारखे पाहुणे मोकळे होत होते. पण थोडं शांतपणानं पाहिलं की जाणवायचं, की तो बावळट भोळेपणा नाहीय, ती समज आहे, इतरांना बदलवून टाकण्याची त्यात क्षमता आहे. सांगत्यमध्ये आलेल्यांना अकिरा कुरुसोवांची ड्रीम्स (विशेषतः भाग ८, पाणचक्क्यांचा गाव,) ही फिल्म बघायला मिळते. (वाचकांनीही ही फिल्म मिळवून पाहावी, अशी या निमित्तानं विनंती. नि10:7/611. ए(06वाब.010/एगर/016810158%281990$॥॥0%29) आपल्या म्हणण्याचं सार असलेली ती फिल्म आहे, असं श्रीकुमारना स्वतःलाच वाटतं, त्यामुळे एक दिवसतरी त्यांच्याच संगणकावर ती लागते आणि खोलीभर बसून सगळे बघतात, नंतर अर्थातच मोठी चर्चा. एका संध्याकाळी जेवणानंतर गप्पागाणी झाली तेव्हा श्रीकुमारनं भाचरांच्या आग्रहानं गाणं म्हटलं. आ चलके तुझे मै लेके चलू एक ऐसे गगन के तलैं.... अगदी साधेपणानं, प्रोजेक्शन वगैरे म्हणतात तसलं काही त्यांच्या आवाजात कुठेच नव्हतं, तरीही त्यातून एक गोष्ट प्रतीत होत होती, अत्यंत प्रांजळ खरेपणा! या माणसाचं अस्तित्वच या प्रांजळपणावर उभं आहे, त्याकडे ज्या कुणाचं लक्ष वेधलेलं असेल त्याला ते दिसल्याशिवाय राहात नाही. संजीवनी कुलकर्णी. केवळ पारंपरिक शेती किंवा सेंद्रिय शेती ही आजच्या प्रश्नांवरची उत्तरं नाहीत, हे खरं म्हणजे आपल्याला एव्हाना उमजलेलं आहे. पृथ्वीचा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now