वाड्मय विपयक सात निबंध | Vaangamayavipayak Saat Nibandh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaangamayavipayak Saat Nibandh by वासुदेव विनायक साठे - Vasudev Vinayak Saatheविष्णु शास्त्री - Vishnu Shastri

More Information About Authors :

वासुदेव विनायक साठे - Vasudev Vinayak Saathe

No Information available about वासुदेव विनायक साठे - Vasudev Vinayak Saathe

Add Infomation AboutVasudev Vinayak Saathe

विष्णु शास्त्री - Vishnu Shastri

No Information available about विष्णु शास्त्री - Vishnu Shastri

Add Infomation AboutVishnu Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१, विठ्ठरंच आणि कवित्व. ६ त्यांनीं बुद्या आड रानांत शिरून केलेले विलक्षण अथ पुष्कळ आहेत. त्यांवर यापूर्वी पुष्कळ चर्चा मागेच झाली; व तीत येवढ्या मोठ्या ग्रंथकाराची व लोकोपकारी सदय्- हस्थाची होऊं नये अशी चारगटपणाची विनाकारण पुष्कळ विटंबनाहि झाली, हेंहि येथें लिहिणे आम्हांस वाजवी वाटत. असो; व्या टीकेच्या संबंधाने प्रस्तुत प्रसंगीं लिहाव- वयाचें तें हेच की, तीत पहिल्या केकेवर व्याख्या देतांना दादोबांनी वरील अप्रयोजक टीकाकारांचा बाणा उचलला आहे. पहिल्या मंगलाचरणखूप त्रेकेचा अथ अगदीं उघड असतां तीवर पंचवीसतीस पाने व्याख्या देऊन तिचा अर्थ वेदांतपर लावला आहे ! असो; तेव्हा शेष म्हणजे कवितेचा जीव-प्राण, व पांडित्याचा परमोत्कषे म्हणजे चार वर्षीच्या पोराच्या बोलण्यातहि निरनिराळे अथे काढण, असे मानणारांचा हा तिसरा वर्ग झाला. आतां याहूनहि वरचा वग नादलुब्ध लोकांचा, यांच्या मतें कवितेचे सवैस्व पद्रचनेंतील माधुर्य होय. शब्द अमळ थाटामाटाचे घातलेले असून ते कानास गोड लागतीलसे असले की झाली उत्कृष्ट कविता ! ही परीक्षा म्हणजे स्रियांच्या रूपाचें मान त्यांच्या गळ्यावर म्हणजे मधुर स्वरावर बसविण्यासारखे असमंजस आहे, मधुर रचना हॅ उत्कृष्ट कवितेचे एक अंग खरे; पण तिचे सर्वस्व नव्हे. याप्रमाणे निरनिराळ्या लोकांची कवित्वाविषयीची भिन्न भिन्न मतें सांगितली. पण यग्रेवढ्यांतच सर्वांचा समावेश होत नाहीं. या चौघांशिवाय बाकीचे जे कोणी आहेत त्यांचा कशाविषयीच आग्रह नसतो. त्यांचा अभि- प्राय नेहमीं चारचौधां विद्वानां सारखा पड[वयाचा,---म्हणजे ते जें म्हणर्ताल त्याचा अनुवा- द करणें हेच त्यांचे मत! ते स्वतः म्हणून कर्घा विचार करावयाचे नाहीत | ढारलीसारखीं पागोटी जाऊन चंबूंचा प्रघात पडला, गजरेदार अंगरखे जाऊन पोकळ अगरख्यांची भास? पडली, हें पाहून विद्वानाच्या आभेरुचीस त जसे अच्युसरत गेले, त्याचप्रमाणें त्यांची सव गोष्टीविषयी मते वरचेवर फिरत असतात. ती अशी बेचूक कीं, कोणी मनुष्य जर खेडेगांवांत जाऊन राहिला किंवा देशांतरास गेला असला तर पुनः शहरास परत आल्यावर अशा मनुष्याशी त्याने चार घटका प्रसंग केला की पुरे, त्यास तोपर्यंत झालेल्या फेरफारांची सगळी माहिती तेव्हांच व्हावयाची असे लोक जर विद्वानांच्या समाजांत मेजवानीस बसले असले तर त्याचे लक्ष नेहमी विद्वानांच्या तोंडांकडे असेल, व त्यांच्या तो डांवर जसे राचभेदेकरून विकार झालेले दृष्टीस पडतील,तसे हुबेहुब आपल्याहि तोंडावर ते उठावितील,---म्हणजे प्रसंगाबुसार साखरेच्याहि पदाथाला तोंड आंबट कर- तील, किंवा एकादा तुरट पदार्थ मोठा मिष्ट म्हणून त्याचा स्वाद वाखागतील | सारा, अजून आपल्या लोकांत खरे परीक्षक फारच थोडे आहेत; व यामुळें काव्य म्हणजे *-१, भास पंडली म्ह० शेली (सरणी, रीत, प्रघात, रूढि) चालू झाली. --'*सं०*




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now