वैदिक संस्कृतीचा विकास | Vaidik Sanskriticha Vikaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaidik Sanskriticha Vikaas by ळक्ष्मण शास्त्री जोशी - Lakshman Shastri Joshi

More Information About Author :

No Information available about ळक्ष्मण शास्त्री जोशी - Lakshman Shastri Joshi

Add Infomation AboutLakshman Shastri Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(५) भाहेत. विद्या व कला हा संस्कृतीचा गाभा होय. संस्कृतीच्या चैतम्य- शक्तीचा साठा या गाभ्यांत असतो, पौर्वात्य देशांतील विद्यापीठं व शिक्षण- संस्था यांचा मुख्य शिक्षणक्रम म्हणजे पाश्चास्य बिद्या व कला यांचा शिक्षणक्रम होय, गणित व तर्कशास्त्र हा विज्ञानाचा पाया आहे. त्यांत पाश्चात्यांनी भारतीय किंवा पौर्बाह्य गणितापेक्षा व तर्कशाक्षापेक्षा फार मोठी प्रगति केली आहे. विज्ञानाच्या व विज्ञाननिष्ठ तंत्राच्या शेकडो शाखा अगदी नूतन आहेत. त्याबाबतीत पौर्वात्यांना, पाश्चात्य युरूंच्याच मागाने काही कालपर्यंत जावें लागेल, स[माजिक शास्त्र सुद्धा अगदी नवीन पाश्चायप्रगीतच आहेत. राजकीय संघटनेची तत्त्वें पाश्चाय्यांचींच घ्यावी लागत आहेत. वाड्यय आणि ललितकला यांच्यांतील भावनांची स्पंदने व तंत्र पाश्चात्यांच्या संसगाने बदलून गेलें आहे. पाथ्वात्य संस्कृतीने सर्व जुन्या विद्यमान संस्कृतींना वेढून टाकलें आहे. ती त्या संस्कृतींना एका विश्वव्यापी संस्कृतीच्या रसांत आटवून टाकण्यास बद्धपरिकर झाली आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या शक्ति विशाल प्रभावी दिग्विजयी व देदिप्य- मान आहेत. त्यांनी या जुन्या संस्कृतींना निष्प्रभ करून सोडलें आहे. गेल्या तीनशे वर्षात तिची अव्याहत प्रगति झाल्यामुळे तिच्या तत्त्ववेद्यांनी प्रगति हाच मानवी संस्कृतीचा व इतिहासाचा स्वभावधमे ठरविला. इतिहासाच्या शक्ति वळणे घेऊन प्रगतीचा माग अनिवार्यपणे आक्रमीत असतात, त्यांना कोणी आढवू शकत नाही, अशा सिद्धांताला ते येऊन पोचले, परंतु विसाव्या शतकाच्या मध्यभागांत त्या संस्कृतीच्या अवनतीचीं व विनाशाची अवलक्षणें प्रकट होऊ लागलीं आहेत. प्रगतिवादाच्या निश्चयाला विपरीत अनुभवाचे व भावी सवं- विनाशक संग्रामाच्या भयाचे हादरे बसून तो ढासळून चालला आहे. मानव- संस्कृतीच्या भवितव्याची काळजी करणारे तत्त्वचितक विनाशाचीं अवलक्षणें पाहून विनाशाच्या व अवनतीच्या कार्यकारणभावाची चिंताजनक मीमांसा मांडू लागले आहेत. अशा गंभीर मौीमांसेचे मोठे मोठे प्रबंध निबंध व ग्रंथ गेल्या ३० वर्षात शेकडों बाहेर पडले आहेत. भौतिक विज्ञानाची अपरिमित प्रगति आणि यांत्रिक व औद्योगिक सुधार- णांचा प्रचंड विस्तार यांच्या योगाने मनुष्यजातीला संपूण समद्धौचे युग जवळ आलें आहे असा भास या विनाशकाळींही पाश्चात्य संस्कृति निर्माण करीत आहे. परंतु हा केवळ भास नाही, त्यांत तथ्यहि पुष्कळ आहे, यांत्रिक संस्कृतीने उत्क- षाची व विनाशाची अशीं दोन्ही प्रकारचीं सामर्थ्ये निर्माण केलीं आहेत. परंतु ही संस्कृति पेटलेल्या मशाली सारखी किंवा अभिसारखी आहे. मशाल मागंेदशे- नहि करिते व धरँहि पेटवून देते. अभि देहास जाळतो किंवा देहरक्षणास उप- योगींहि पडतो. मशाल किंवा अभि यांचा उपयोग करणाऱ्या माणसावर हीं कार्ये




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now