ळो. टिळक व म. गांधी | Lo Tilak V M Gaandhii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Lo Tilak V M Gaandhii by शं. द. जावडेकर - Shan. D. Javadekar

More Information About Author :

No Information available about शं. द. जावडेकर - Shan. D. Javadekar

Add Infomation AboutShan. D. Javadekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
छो. टिळक व स गाधी & आळी आ. का ली आटी विटी चि विटी टि टी टी आटी की आ की ली हरळी टीन कटी आली आवि ली कटी उच्च ध्येयांचा उदय होणे हे अवशयच असतें. मनुष्यांच्या स्वार्थी पाशवी वृत्ति दाबांत ठेवणारी धमबुद्धि समाजांत जाग्रत झाल्याखेरीज देशाच्या राजकारणा- करितां आपल्या स्वार्थाची होळी करण्यास लोक तयार होणें शक्‍य नाहीं तसॅच राजकीय संस्थांच्या अस्तित्वाखेरीज किवा सुस्थितीखेरीज धर्माचेंहि संरक्षण होणें शक्‍य नाहीं, हा धमे आणि राजकारण यांतील अत्यंत निकट संबंध समजून त्या- वरच त्यांचें घोरण आांखलेलें दिसून येतें राष्ट्रसंवघेनाच्या कार्याची राष्ट्रीय भावना व राष्ट्रीयसंघटना अशीं दोन अंगे भसतात. लोकमान्यांच्या आयुष्यातील बहुतेक भाग राष्ट्रीय भावना जागत करून ती प्रभावशाली करण्यांतच खच झालेला आहे आणि म्हणूनच नेमस्त पक्षाकडून त्यांच्या कार्यावर “ विध्वसक कार्य ”” असा शेरा मारला जात असे. परंतु राष्ट्रीय संघटनेचे काये राष्ट्रीय ध्येयांना अनुसरून व राष्ट्रीय प्रयत्नानीं होईल तरच तें परिणामीं हितावह होईल, अशी त्यांची खात्री असल्यामुळे परकीय घ्येयांनीं प्रेरित होऊन परकीय राज्यकर्त्याच्या मदतीनें चालविलेल्या संघटनेच्या प्रयत्नांवर त्यांना टीका करावी लागत असे. जोपर्यंत राष्ट्रंत राष्रीय भावनाच उदित झालेली नव्हती, तोंपर्यंत राष्ट्रीय संघटना द्ोोणें अशक्यच होतें. तथापि लोकमान्यांचा राष्ट्रीय संघटनेचा कायेकम स्वदेशी व राष्ट्रीय शिक्षण या रूपानें १९०५-०६ सालापासून जनतेपुढे आहे आणि त्या रूपानें व्यापक प्रयत्न करून लोकमान्यांनी जागृत केलेली राष्ट्रीय भावना चिरंतन करणें, हें त्यांच्या अचुयायांचें आद्य कतेंन्य आहे तथापि व्यक्त स्वरूपाची राष्ट्रसघटना फार मोठ्या प्रमाणावर परतंत्र राष्ट्रांत होऊ शकत नाहीं, हें जाणून लोकमान्यांचे सवव प्रयत्न स्वराज्याच्या एका प्रश्नावरच केंद्रीभूत झालेले होते. या कार्याकरितां राष्रीय सभा संघटित व सामथ्येवती बनवावी, याबद्दल त्यांचे सै प्रयत्न चालू अस्त. राष्ट्रीय सभा ही केवळ विचार- विनिमयाची संस्था न राहतां तिनें स्वराज्याच्या दृष्टीनें देशाची राजकीय संघटना करावी आणि तिच्या पाठिब्यावर सरकारशी स्वराज्याचा लढा खेळणारा एक लोकशाहीचा पक्ष देशांत अस्तित्वांत यावा व त्यानें आपल्या देशास शक्य तितक्या लवकर राजकीय दास्यांतून मुक्त करावें, याबद्दल त्यांचे अखेरचे प्रयत्न चाळू होते. राष्रीय सभेत साम्राज्यांत्गत स्वराज्यवादी व निर्भेळ स्वराज्यवादी या दोघांचाहि समावेश व्हावा, परंतु सर्वांनी बहुमताचे निय मान्य करावेत व राष्ट्रीय सभेच्या नांवानें काय करावें असें त्यांचें म्हणणें होतें.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now