आधुनिक भारत | Aadhunik Bhaarat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aadhunik Bhaarat by शं. द. जावडेकर - Shan. D. Javadekar

More Information About Author :

No Information available about शं. द. जावडेकर - Shan. D. Javadekar

Add Infomation AboutShan. D. Javadekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लेखकाचे चार शब्द ह. स॒ १८१८ मध्ये पेशवाईचा अत दोऊन ब्रिटिश सत्ता भारतांत सार्वभौम बनळी त्याच सुमारास बंगालमध्य आधुनिक भारताचा जन्म झाला राजा राम- मोहन रॉय हे पहिले आधुनिक भारतीय होत आधुनिक युगाचा प्रारभ होऊन या वेळी दोन-अडीच शतके तरी होऊन गेलीं होतीं हसवी सनाचे सोळावे शतक हे आधुनिक युरोपच्या जन्माचे शतक समजले जाते. सोळाव्या व सतराव्या शतकात ब्रिटनने आपली जी सवागीण सुधारणा व प्रगति केळी, तिव्यामुळे अठराव्या शतका- च्या प्रारभीं ते राष्ट्र युरोप खडानच्या आघाडीवर जाऊन पोहोचले अठराव्या शतकांत सर्व जगाच नेतृत्व करण्याच्या कामी ब्रिटन व फ्रान्स या दोघांत चुरस लागली होती याच काळांत हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न मराठे करीत होते. मोगल बादशाद्दी हर्तगत करून भारतात आपले सावंभीमत्व प्रस्थापित करण्याच्या उद्योगात आपण यशस्वी झालो, असा भ्रम मराठ्यांना होतो न होतो, तोच ब्रिटिशांनी हिंदुस्थानात मोगल व मराठे या दोघानाहि आपले अंकित बनविले आणि त्याच सुमारास फ्रेचांचाहि पाडाव करून जगाचे नेतृत्व संपादन केले. एकोणिसावे शतक हा ब्रिटिशांच्या जागतिक नेठ्त्वाचा आणि आधुनिक भारताच्या जन्माचा काळ म्हणून जगाच्या इतिहासात लिहिला पाहिजे. या दृष्टिकोणार्ने जागतिक इतिहासातील ह प्रकरण लिहिलं जाण्यास अद्यापि थोडा अवधि लागणार आहे त्यापूर्वी भारतीय दृष्टिकोणांतून आधुनिक भारताच्या जन्माची कथा अनेका- कडून लिहिली गेछी पाहिजे प्रस्तुत पुस्तक हा असाच एक प्रयत्न आहे या पुस्तकात राजा राममोहन रॉय यांच्यापासून म गाधी याच्यावर्यंतच्या काळात जे कर्तृत्वान्‌ व द्रष्टे भारतीय नेते झाले, त्याच्या चरित्राची, कार्यांची व विचाराची स्थूल रूपरेषा देण्यांत आळी आहे तसच या काळात ज एक नवे राष्ट्र निर्माण होऊन जगाच्या रंगभूमीवर प्रविष्ट झाले आहे, त्याचा सास्कृतिक दाट्िकोण कोणता आहे व तो तसा कसा बनत गेला, याचेंहि तात्त्विक विवेचन करण्यात आले आहे. व्यक्तिवाद; राष्ट्रवाद आणि समाजवाद आधुनिक भारताच्या निर्मितीच्या कायात ज्यार्नी ज्यानी भाग घेतला, त्याच्या त्याच्या प्रयत्नांमार्ग जी निरानेराळी सामाजिक तत्त्वज्ञाने होतीं, त्याचा ऐतिहासिक दृष्टीनं विचार केल्यास अशीं तीन तत्त्वज्ञान असल्याचे कोणाहि विचारवतास दिसून येणार आहे. या तीन तत्त्वजञानाना अनुक्रम व्यक्तिवाद, राष्ट्रवाद व समाजवाद अशी नांवे देतां येतील. व्यक्तिवादी तत्त्वज्ञानांतून सवांगीण सुधारक पथ आणि प्रागतिक राजकीय पक्ष यांचा उदय झाला राष्ट्रवादी तत्त्वज्ञानांतून आध्यात्मिक राष्ट्रीय भावना




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now